शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

भालिवली रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा!

By admin | Updated: January 13, 2017 05:40 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे. याबाबत आयआरबी प्रशासनाला अनेकदा आठवण देऊनही ती त्याचे काम सुरु करण्यास चालढकल करीत आहे. भालिवली हा एक असा नाका आहे की, महामार्गाच्या विभागलेल्या रस्त्यावर भालिवली व त्याच्या पुढे पुन्हा विभागलेल्या एका रस्त्यावरून , बेलवाडी, पाचरु खे , मडकेपाडा, किणी पाडा, तरे पाडा व दुसऱ्या रस्त्यावर जांभूळ पाडा, नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा आदी गावांव्यतिरिक्त अनेक पाडे व वस्त्या आहेत. यामध्ये खानिवडे प्रतिभा विद्यामंदिरात , बेलवाडी शासकीय आश्रम शाळेत येणारे व महाविद्यालयीन शिक्षणासाठी चांदीप, वसई, विरार येथे जाणारे हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत. तसेच भाताणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे उपचारार्थ जाणारे-येणारे रुग्ण, शेतकरी, कष्टकरी, सोमवार व गुरु वारच्या आठवडे बाजारात येणारे जाणारे बाजारकरू, सातिवली , पेल्हार विरार वसई येथील छोट्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक तसेच तीन गावांसाठी असलेली महामंडळाची बस सेवा आदींना हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागत आहे. यामुळे आजतागायत या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कित्येक जणांना कायमचे अपंगत्व आले. तरी या पूलाचे बांधकाम सुरु होत नाही. त्यामुळे अजून किती अपघात घडून बळी गेले म्हणजे आयआरबी या पूलाचे बांधकाम सुरू करेल असा संतप्त सवाल येथील प्रवासी व रहिवासी करीत आहेत. (वार्ताहर)याबाबत अनेकदा तक्र ारी केल्यानंतर १५ दिवसांपूर्वी येथे काम चालू केले होते. मात्र काहीच अंतरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण आयआरबी बांधकाम प्रशासनाने देऊन काम थांबवले आहे . मात्र हे कारण संयुक्तिक नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने दिरंगाई टाळून उड्डाण पुलाचे काम सुरु करणे आवश्यक आहे. अन्यथा गावकरी टोल नाका बंद पाडणार असून पुढे उचलणार असलेल्या पावलास आयआरबी प्रशासन जबाबदार असेल .- नरेंद्र पाटील, माजी उप सभापती पं.स. वसई काही अडचणींमुळे काम बंद आहे हे जरी खरे असले तरी ते येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ववत सुरु होणार आहे . ’’- अमित साठे, आयआरबी बांधकाम अधिकारी