शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

मार्चच्या सुरुवातीलाच टंचाई, दुष्काळग्रस्त विक्रमगडमध्ये पाण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:07 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून या भागामध्ये उपाययोजनाची अमलबंजावणी सुरु असली तरी संथ गतीने सुरु आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भीषण नसली तरी मार्चनंतर पाणी टंचाई गंभीर होणार आहे.तालुक्याची भौगोलीक विविधता पाहिल्यास काही भाग डोंगराळ असून या भागात उन्हाळ्यात दर वर्षी गंभीर पाणी टंचाई जाणवते. या वर्षी सरासरी पेक्षा खुपच कमी पाऊस पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने भूजल साठ्यावर परिणाम झाला आहे. यंदा फेब्रूवारी महिन्यातच नदी-ओहळाची पात्र कोरडी पडली आहेत. तसेच तालुक्यातील काही तलाव, विहिरींची पातळी खालावल्याने यावर्षी मार्च महिन्याच्या पंधरावड्यानंतर शासकीय उपोययोजनांची गरज भासणार आहे.यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर, रब्बी हंगाम ही जमीनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले नाही. टंचाईवर मात करणे अशक्यप्राय असून यावर नियोजन करणे आवश्यक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस पावले उचलण्याची मागणी विक्की प्रजापती यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळाबाबत शासकीय अधिकारी गंभीर नाहीत असा आरोप अखिल भारतीय आदिवाशी विकास परिषद तालुका प्रमुख लहू नडगे यांनी केली आहे.>दुष्काळाबाबत कृषी विभागाची अनास्थादुष्काळी उपाययोजनांना शासकीय अधिकाऱ्यांकडूनच खोडा घालायला सुरवात झाली असून. तालुका कृषी विभागा मार्फत मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली मात्र, तालुक्यात अनेक शेततलाव एक वर्षा पासुन मंजूर असून ही निधी नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना माघारी धाडले जात आहे.या वर्षी तरी ही शेततळी पुर्ण होणे गरजेच आहे असे शेतकºयांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. सरकार फक्त दुष्काळी भागातच निधी देऊन टाकते. नंतर काही उपायोजना करीत नाही असे नागरीकांचे मत आहे.>शासकीय उपाययोजना व आदेशजमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगिडत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोहयोच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज जोडणी करणे, असे आदेश शासनाने दिले आहेत.>तालुक्यात गंभीर दुष्काळ असला तरी मोठया प्रमाणात टंचाई नाही तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात पशुपालन, शेतकºयाना मोफत पशुवैरण वाटप करण्यात आला आहे. २२ ठिकाणी तलाव, ओहल, व नदी मधील गाल काढन्यास सुरवात असुन. ४ सिंचन विहिरीची कामे सुरु करण्यात आली आहेत.-प्रदीप डोलारे, स.बीडिओ