शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

मार्चच्या सुरुवातीलाच टंचाई, दुष्काळग्रस्त विक्रमगडमध्ये पाण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:07 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून या भागामध्ये उपाययोजनाची अमलबंजावणी सुरु असली तरी संथ गतीने सुरु आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भीषण नसली तरी मार्चनंतर पाणी टंचाई गंभीर होणार आहे.तालुक्याची भौगोलीक विविधता पाहिल्यास काही भाग डोंगराळ असून या भागात उन्हाळ्यात दर वर्षी गंभीर पाणी टंचाई जाणवते. या वर्षी सरासरी पेक्षा खुपच कमी पाऊस पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने भूजल साठ्यावर परिणाम झाला आहे. यंदा फेब्रूवारी महिन्यातच नदी-ओहळाची पात्र कोरडी पडली आहेत. तसेच तालुक्यातील काही तलाव, विहिरींची पातळी खालावल्याने यावर्षी मार्च महिन्याच्या पंधरावड्यानंतर शासकीय उपोययोजनांची गरज भासणार आहे.यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर, रब्बी हंगाम ही जमीनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले नाही. टंचाईवर मात करणे अशक्यप्राय असून यावर नियोजन करणे आवश्यक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस पावले उचलण्याची मागणी विक्की प्रजापती यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळाबाबत शासकीय अधिकारी गंभीर नाहीत असा आरोप अखिल भारतीय आदिवाशी विकास परिषद तालुका प्रमुख लहू नडगे यांनी केली आहे.>दुष्काळाबाबत कृषी विभागाची अनास्थादुष्काळी उपाययोजनांना शासकीय अधिकाऱ्यांकडूनच खोडा घालायला सुरवात झाली असून. तालुका कृषी विभागा मार्फत मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली मात्र, तालुक्यात अनेक शेततलाव एक वर्षा पासुन मंजूर असून ही निधी नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना माघारी धाडले जात आहे.या वर्षी तरी ही शेततळी पुर्ण होणे गरजेच आहे असे शेतकºयांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. सरकार फक्त दुष्काळी भागातच निधी देऊन टाकते. नंतर काही उपायोजना करीत नाही असे नागरीकांचे मत आहे.>शासकीय उपाययोजना व आदेशजमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगिडत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोहयोच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज जोडणी करणे, असे आदेश शासनाने दिले आहेत.>तालुक्यात गंभीर दुष्काळ असला तरी मोठया प्रमाणात टंचाई नाही तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात पशुपालन, शेतकºयाना मोफत पशुवैरण वाटप करण्यात आला आहे. २२ ठिकाणी तलाव, ओहल, व नदी मधील गाल काढन्यास सुरवात असुन. ४ सिंचन विहिरीची कामे सुरु करण्यात आली आहेत.-प्रदीप डोलारे, स.बीडिओ