शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मार्चच्या सुरुवातीलाच टंचाई, दुष्काळग्रस्त विक्रमगडमध्ये पाण्यासाठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:07 IST

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच गंभीर दुष्काळ यादीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून या भागामध्ये उपाययोजनाची अमलबंजावणी सुरु असली तरी संथ गतीने सुरु आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाईची समस्या भीषण नसली तरी मार्चनंतर पाणी टंचाई गंभीर होणार आहे.तालुक्याची भौगोलीक विविधता पाहिल्यास काही भाग डोंगराळ असून या भागात उन्हाळ्यात दर वर्षी गंभीर पाणी टंचाई जाणवते. या वर्षी सरासरी पेक्षा खुपच कमी पाऊस पडल्याने तसेच परतीच्या पावसाने दगा दिल्याने भूजल साठ्यावर परिणाम झाला आहे. यंदा फेब्रूवारी महिन्यातच नदी-ओहळाची पात्र कोरडी पडली आहेत. तसेच तालुक्यातील काही तलाव, विहिरींची पातळी खालावल्याने यावर्षी मार्च महिन्याच्या पंधरावड्यानंतर शासकीय उपोययोजनांची गरज भासणार आहे.यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर, रब्बी हंगाम ही जमीनीत ओलावा नसल्याने शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले नाही. टंचाईवर मात करणे अशक्यप्राय असून यावर नियोजन करणे आवश्यक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने पाणी टंचाई निवारणार्थ ठोस पावले उचलण्याची मागणी विक्की प्रजापती यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळाबाबत शासकीय अधिकारी गंभीर नाहीत असा आरोप अखिल भारतीय आदिवाशी विकास परिषद तालुका प्रमुख लहू नडगे यांनी केली आहे.>दुष्काळाबाबत कृषी विभागाची अनास्थादुष्काळी उपाययोजनांना शासकीय अधिकाऱ्यांकडूनच खोडा घालायला सुरवात झाली असून. तालुका कृषी विभागा मार्फत मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली मात्र, तालुक्यात अनेक शेततलाव एक वर्षा पासुन मंजूर असून ही निधी नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना माघारी धाडले जात आहे.या वर्षी तरी ही शेततळी पुर्ण होणे गरजेच आहे असे शेतकºयांचे म्हणणे आहे. कृषी विभागाकडून प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. सरकार फक्त दुष्काळी भागातच निधी देऊन टाकते. नंतर काही उपायोजना करीत नाही असे नागरीकांचे मत आहे.>शासकीय उपाययोजना व आदेशजमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगिडत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोहयोच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकºयांच्या शेतीपंपाची वीज जोडणी करणे, असे आदेश शासनाने दिले आहेत.>तालुक्यात गंभीर दुष्काळ असला तरी मोठया प्रमाणात टंचाई नाही तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात पशुपालन, शेतकºयाना मोफत पशुवैरण वाटप करण्यात आला आहे. २२ ठिकाणी तलाव, ओहल, व नदी मधील गाल काढन्यास सुरवात असुन. ४ सिंचन विहिरीची कामे सुरु करण्यात आली आहेत.-प्रदीप डोलारे, स.बीडिओ