शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पालघरमधील समुद्रकिनारे सोमवारपासून गजबजणार; हॉटेल्स, रिसॉर्टमालकांची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 00:03 IST

मार्चपासून पर्यटन व्यवसाय ठप्प, कोरोनाच्या जागतिक संकटामुळे डहाणू ते वसई या ११२ कि.मी. किनारपट्टीसह आठ तालुक्यांतील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला होता.

हितेन नाईक 

पालघर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद पडलेला जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सुरू होण्याचे आदेश सोमवारी निघणार असून सुने सुने पडलेले बीच गर्दीने पुन्हा फुलून निघणार आहेत. त्यामुळे झाई ते वसईदरम्यानच्या हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे डहाणू ते वसई या ११२ कि.मी. किनारपट्टीसह आठ तालुक्यांतील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला होता. गेल्या सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नेपाळ, यूपी आदी भागातील कामगार, स्वयंपाकी कोरोनाच्या भीतीने गावी निघून गेल्याने रिसॉर्ट मालकांची स्वयंपाकघरे बंद आहेत. मागच्या सात महिन्यांपासून एका पैशाचेही उत्पन्न नसताना पर्यटन निवासाची देखभाल, भली मोठी विद्युत बिले, कामगारांचे पगार-मानधन, ग्राम पंचायतीचे कर, सर्व्हिस कर, आयकर, विक्रीकर आदीचा मोठा भुर्दंड त्यांच्या डोक्यावर पडला आहे.

सप्टेंबर महिन्यात किचकट अशा अटी-शर्तीवर पर्यटनगृहे चालू करण्याची परवानगी शासनाने दिली असली तरी सर्व समुद्रकिनारे, बीच, धबधबा, गड-किल्ले यावर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश बजावले होते. आता नवीन आदेशाप्रमाणे परमिट रूम, बार, बिअर शॉपीसह हॉटेल्स, रिसॉर्ट यांना सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. याचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र आदेश काढला आहे. या आदेशात रिसॉर्ट उघडी ठेवण्याचे नमूद करण्यात आले असले तरी समुद्र किनारे, बीच, धबधबे, नदी-नाले, गडकिल्ले यावर बंदी घालून लादण्यात आलेले मनाई आदेश मात्र रद्द करण्यात आले नाहीत. त्यामुळे बीचवर जाण्यास परवानगी नसेल, तर मग रिसॉर्टमध्ये जाऊन उपयोग काय? असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मनाई आदेशाची मुदत ९ आॅक्टोबर रोजी संपली आहे. पावसाळ्याच्या कालावधीपर्यंतच हा मनाई आदेश असल्याने जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून नवीन आदेश काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :tourismपर्यटनpalgharपालघर