शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पालघरमधील समुद्रकिनारे सोमवारपासून गजबजणार; हॉटेल्स, रिसॉर्टमालकांची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 00:03 IST

मार्चपासून पर्यटन व्यवसाय ठप्प, कोरोनाच्या जागतिक संकटामुळे डहाणू ते वसई या ११२ कि.मी. किनारपट्टीसह आठ तालुक्यांतील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला होता.

हितेन नाईक 

पालघर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद पडलेला जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सुरू होण्याचे आदेश सोमवारी निघणार असून सुने सुने पडलेले बीच गर्दीने पुन्हा फुलून निघणार आहेत. त्यामुळे झाई ते वसईदरम्यानच्या हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे डहाणू ते वसई या ११२ कि.मी. किनारपट्टीसह आठ तालुक्यांतील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला होता. गेल्या सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नेपाळ, यूपी आदी भागातील कामगार, स्वयंपाकी कोरोनाच्या भीतीने गावी निघून गेल्याने रिसॉर्ट मालकांची स्वयंपाकघरे बंद आहेत. मागच्या सात महिन्यांपासून एका पैशाचेही उत्पन्न नसताना पर्यटन निवासाची देखभाल, भली मोठी विद्युत बिले, कामगारांचे पगार-मानधन, ग्राम पंचायतीचे कर, सर्व्हिस कर, आयकर, विक्रीकर आदीचा मोठा भुर्दंड त्यांच्या डोक्यावर पडला आहे.

सप्टेंबर महिन्यात किचकट अशा अटी-शर्तीवर पर्यटनगृहे चालू करण्याची परवानगी शासनाने दिली असली तरी सर्व समुद्रकिनारे, बीच, धबधबा, गड-किल्ले यावर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश बजावले होते. आता नवीन आदेशाप्रमाणे परमिट रूम, बार, बिअर शॉपीसह हॉटेल्स, रिसॉर्ट यांना सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. याचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र आदेश काढला आहे. या आदेशात रिसॉर्ट उघडी ठेवण्याचे नमूद करण्यात आले असले तरी समुद्र किनारे, बीच, धबधबे, नदी-नाले, गडकिल्ले यावर बंदी घालून लादण्यात आलेले मनाई आदेश मात्र रद्द करण्यात आले नाहीत. त्यामुळे बीचवर जाण्यास परवानगी नसेल, तर मग रिसॉर्टमध्ये जाऊन उपयोग काय? असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मनाई आदेशाची मुदत ९ आॅक्टोबर रोजी संपली आहे. पावसाळ्याच्या कालावधीपर्यंतच हा मनाई आदेश असल्याने जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून नवीन आदेश काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :tourismपर्यटनpalgharपालघर