शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जरा जपून, नव्या योजनेसाठी वसईत आज पाण्याचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:48 IST

वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेला जाणवणारी पाणीटंचाई या महिन्याच्या अखेरीस दूर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नव्या पाणी योजनेत वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे. या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी वसईत शुक्रवारी पाण्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

वसई-विरार शहर महानगरपालिकेस सूर्या टप्पा-१ व ३ या योजनेतून २०० द.ल.ली. प्रतिदिन पाणी उपलब्ध होत असून महानगरपालिकेस १४० द.ल.ली. पाण्याची तूट भासत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रकल्पातून ४०३ द.ल.ली. पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६५ द.ल.ली. पाण्यापैकी ८० ते ९० द.ल.ली. पाणी काशिदकोपर  येथे जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी शहरात वितरित करण्याच्या दृष्टीने सूर्या योजनेतील मुख्य जलवाहिनीस काशिदकोपर शुक्रवार २३ जून रोजी जोडणीचे काम केले जाणार आहे. तरी या कामाकरिता सूर्या टप्पा-१ व टप्पा ३ या योजनेतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा २३ जून रोजी १२ ते १८ तास बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होईल, मात्र हे काम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. हे जोडणीचे काम झाल्यावरही जलदा चाचणी व वॉशआऊटकरिता पुढील २ ते ३ दिवस अनियमित व अपुऱ्या दाबाने शहरास पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार    सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाअभावी पाण्याचे संकट आहे. वसईविरारमधील विविध धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.    पाऊस लवकर पडला नाही तर तीव्र पाणीटंचाई शहरात जाणवू शकते, मात्र अशावेळी या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम झाले तर वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे.    त्यामुळे वसई-विरारकरांची पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार