शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

जरा जपून, नव्या योजनेसाठी वसईत आज पाण्याचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 11:48 IST

वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेला जाणवणारी पाणीटंचाई या महिन्याच्या अखेरीस दूर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नव्या पाणी योजनेत वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे. या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी वसईत शुक्रवारी पाण्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

वसई-विरार शहर महानगरपालिकेस सूर्या टप्पा-१ व ३ या योजनेतून २०० द.ल.ली. प्रतिदिन पाणी उपलब्ध होत असून महानगरपालिकेस १४० द.ल.ली. पाण्याची तूट भासत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रकल्पातून ४०३ द.ल.ली. पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६५ द.ल.ली. पाण्यापैकी ८० ते ९० द.ल.ली. पाणी काशिदकोपर  येथे जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी शहरात वितरित करण्याच्या दृष्टीने सूर्या योजनेतील मुख्य जलवाहिनीस काशिदकोपर शुक्रवार २३ जून रोजी जोडणीचे काम केले जाणार आहे. तरी या कामाकरिता सूर्या टप्पा-१ व टप्पा ३ या योजनेतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा २३ जून रोजी १२ ते १८ तास बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होईल, मात्र हे काम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. हे जोडणीचे काम झाल्यावरही जलदा चाचणी व वॉशआऊटकरिता पुढील २ ते ३ दिवस अनियमित व अपुऱ्या दाबाने शहरास पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार    सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाअभावी पाण्याचे संकट आहे. वसईविरारमधील विविध धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे.    पाऊस लवकर पडला नाही तर तीव्र पाणीटंचाई शहरात जाणवू शकते, मात्र अशावेळी या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम झाले तर वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे.    त्यामुळे वसई-विरारकरांची पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार