शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सेनेला धक्का देण्याच्या बविआच्या हालचाली; नाराजी उफाळल्याने समज देण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 01:26 IST

भाजपचा खासदार लादल्यामुळे शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी त्या पक्षातील तालुका स्तरावरील काही नेत्यांना गळाला लावून धक्का देण्याच्या हालचाली बहुजन विकास आघाडीने सुरू केल्या आहेत.

पालघर : भाजपचा खासदार लादल्यामुळे शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी त्या पक्षातील तालुका स्तरावरील काही नेत्यांना गळाला लावून धक्का देण्याच्या हालचाली बहुजन विकास आघाडीने सुरू केल्या आहेत.शिवबंधन बांधत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी काम न करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यातच आयात उमेदवारावर नाराज असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची बविआ नेत्यांसोबत जवळीक वाढल्याने काही नेत्यांना ‘मातोश्री’वर बोलावून समज देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.भाजपच्या ज्या उमेदवाराला नंदुरबारमध्ये पाठवा, असे दहा महिन्यांपूर्वी मतदारांना सांगितले, त्यालाच मते द्या, म्हणून गावोगावी मतदारांच्या दारी कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित करत वेगवेगळ्या तालुकाध्यक्षांनी आधीच बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यातील जे तालुकाध्यक्ष भरघोस मतांची बेगमी करू शकतात, अशा काहींशी बविआच्या नेत्यांनी संपर्क साधला असून तुमची मते आमच्याकडे वळवा, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक-दोघांना तर आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.वसई, विरार, नालासोपारा आणि बोईसर हा पट्टा वगळता बविआचा पाया भक्कम नाही. त्यामुळे तेथून आपल्या उमेदवाराला मते मिळविण्यासाठी त्या पक्षाने या खेळीला सुरुवात केली आहे. त्याचा बोभाटा होताच त्यातील काहींना मुंबईला बोलावून समज देण्यात आली. त्यानंतरही काही नेत्यांनी काम करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ठाण्यातून नेते बोलावून त्यांच्याकडे प्रचाराची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता आहे.गावितांबद्दलचा असंतोषही उघडविक्रमगड तालुक्यात पालकमंत्री विष्णू सवरांबद्दल असलेला असंतोष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिवसेना-भाजप नेते परस्परांविरोधात लढले होते, तेथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावागावांतील नाराज नेत्यांनी ‘पक्ष सांगेल ते करू’ अशी जाहीर भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू केलेले नाही.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाpalgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक