शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

बंदीआदेश पायदळी तुडवत मच्छीमारी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:07 IST

सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.

विरार - सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.तर यांच्यावर कारवाई करणाऱ्या सागरी किनारा सुरक्षा बोटी देखील बंद करण्यात आल्या असल्याने त्यांना मासेमारांना पकडणे अवघड होत आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला चक्री वादळाची शक्यता जाणवत असल्याने तसेच माशांच्या प्रजोत्पन्नाचा हा काळ असल्याने समुद्रामध्ये मासेमारी पूर्णत: बंद करण्याचा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे. तर सर्वत्र मासेमारी बंद असून बोटी किनाºयाला लागल्या आहेत परंतु काही मासेमार हे आर्थिक हव्यासापोटी अजूनही पाण्यात उतरत आहेत. पावसाळ्यात पाण्यात उंच उंच लाटांमुळे होडीवर ताबा मिळवता येत नाही तर अनेकदा होडी वाहून जाते. खाडी मधील मासेमारी (बिगर यांत्रिकी) मासेमारी सुरु असली तरी त्या ठिकाणी मासे मिळाले नाही तर मच्छीमार खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतात. खाडीच्या अर्धा कि.मी पुढे गेल्यानंतर परत येणे शक्य होत नाही तर काही मच्छीमार हे माश्यांच्या शोधात खोलवर जातात व आपला जीव गमावतात.विशेष म्हणजे पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने अशा मच्छिमारांना मर्यादा येतात. मच्छीमार सोसायटी या त्यांच्यावर कारवाई करतात. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. तसेच, त्या बोटीचा विमा देखील रद्द केला जातो जर त्या बोटीचा विमा असेल तर तो मासेमारांना मिळत नाही. आता पर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून यावर रोक लावण्याचा प्रयत्न मच्छीमार सोसायट्या व सागरी किनारा रक्षक करत आहेत. बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर त्यांना नौदलाची बोट वाचवू शकते मात्र पावसाळ्यात अपघाताची शक्यता जास्त असते.मासेमारी हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याने त्यांच्या वर पूर्ण पणे रोक लावता येत नाही परंतु गंभीर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा नोंदवतो.-विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक,निसर्गाचा -हास होतोच पण त्यांच्या जीव देखील धोक्यात येतो. पावसाळ्यात वादळ असले की, पेट्रोलिंग देखील बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री नसते.- रवींद्र पाटील, सागरी सुरक्षा अधिकारीखाडी मधील मासेमारी सुरु आहे. ती बंद झालेली नाही मात्र, मच्छीमार जर समुद्रात जात असतील तर तो गुन्हा आहे. काही बोटी लांबच्या दौºयावर गेलेले असतात त्यांना परतण्यास वेळ लागतो म्हणून मासेमारी बंद झाल्यानंतर ही ते समुद्रात दिसतात.- संजय कोळी, अध्यक्ष,मच्छीमार समिती

टॅग्स :Virarविरारfishermanमच्छीमार