शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बंदीआदेश पायदळी तुडवत मच्छीमारी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:07 IST

सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.

विरार - सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.तर यांच्यावर कारवाई करणाऱ्या सागरी किनारा सुरक्षा बोटी देखील बंद करण्यात आल्या असल्याने त्यांना मासेमारांना पकडणे अवघड होत आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला चक्री वादळाची शक्यता जाणवत असल्याने तसेच माशांच्या प्रजोत्पन्नाचा हा काळ असल्याने समुद्रामध्ये मासेमारी पूर्णत: बंद करण्याचा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे. तर सर्वत्र मासेमारी बंद असून बोटी किनाºयाला लागल्या आहेत परंतु काही मासेमार हे आर्थिक हव्यासापोटी अजूनही पाण्यात उतरत आहेत. पावसाळ्यात पाण्यात उंच उंच लाटांमुळे होडीवर ताबा मिळवता येत नाही तर अनेकदा होडी वाहून जाते. खाडी मधील मासेमारी (बिगर यांत्रिकी) मासेमारी सुरु असली तरी त्या ठिकाणी मासे मिळाले नाही तर मच्छीमार खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतात. खाडीच्या अर्धा कि.मी पुढे गेल्यानंतर परत येणे शक्य होत नाही तर काही मच्छीमार हे माश्यांच्या शोधात खोलवर जातात व आपला जीव गमावतात.विशेष म्हणजे पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने अशा मच्छिमारांना मर्यादा येतात. मच्छीमार सोसायटी या त्यांच्यावर कारवाई करतात. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. तसेच, त्या बोटीचा विमा देखील रद्द केला जातो जर त्या बोटीचा विमा असेल तर तो मासेमारांना मिळत नाही. आता पर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून यावर रोक लावण्याचा प्रयत्न मच्छीमार सोसायट्या व सागरी किनारा रक्षक करत आहेत. बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर त्यांना नौदलाची बोट वाचवू शकते मात्र पावसाळ्यात अपघाताची शक्यता जास्त असते.मासेमारी हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याने त्यांच्या वर पूर्ण पणे रोक लावता येत नाही परंतु गंभीर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा नोंदवतो.-विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक,निसर्गाचा -हास होतोच पण त्यांच्या जीव देखील धोक्यात येतो. पावसाळ्यात वादळ असले की, पेट्रोलिंग देखील बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री नसते.- रवींद्र पाटील, सागरी सुरक्षा अधिकारीखाडी मधील मासेमारी सुरु आहे. ती बंद झालेली नाही मात्र, मच्छीमार जर समुद्रात जात असतील तर तो गुन्हा आहे. काही बोटी लांबच्या दौºयावर गेलेले असतात त्यांना परतण्यास वेळ लागतो म्हणून मासेमारी बंद झाल्यानंतर ही ते समुद्रात दिसतात.- संजय कोळी, अध्यक्ष,मच्छीमार समिती

टॅग्स :Virarविरारfishermanमच्छीमार