शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

बंदीआदेश पायदळी तुडवत मच्छीमारी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:07 IST

सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.

विरार - सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत.तर यांच्यावर कारवाई करणाऱ्या सागरी किनारा सुरक्षा बोटी देखील बंद करण्यात आल्या असल्याने त्यांना मासेमारांना पकडणे अवघड होत आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला चक्री वादळाची शक्यता जाणवत असल्याने तसेच माशांच्या प्रजोत्पन्नाचा हा काळ असल्याने समुद्रामध्ये मासेमारी पूर्णत: बंद करण्याचा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे. तर सर्वत्र मासेमारी बंद असून बोटी किनाºयाला लागल्या आहेत परंतु काही मासेमार हे आर्थिक हव्यासापोटी अजूनही पाण्यात उतरत आहेत. पावसाळ्यात पाण्यात उंच उंच लाटांमुळे होडीवर ताबा मिळवता येत नाही तर अनेकदा होडी वाहून जाते. खाडी मधील मासेमारी (बिगर यांत्रिकी) मासेमारी सुरु असली तरी त्या ठिकाणी मासे मिळाले नाही तर मच्छीमार खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतात. खाडीच्या अर्धा कि.मी पुढे गेल्यानंतर परत येणे शक्य होत नाही तर काही मच्छीमार हे माश्यांच्या शोधात खोलवर जातात व आपला जीव गमावतात.विशेष म्हणजे पावसाळ्यात सागरी किनारा सुरक्षा पथकाच्या बोटी देखील बंद असल्याने अशा मच्छिमारांना मर्यादा येतात. मच्छीमार सोसायटी या त्यांच्यावर कारवाई करतात. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. तसेच, त्या बोटीचा विमा देखील रद्द केला जातो जर त्या बोटीचा विमा असेल तर तो मासेमारांना मिळत नाही. आता पर्यंत अशा अनेक घटना घडल्या असून यावर रोक लावण्याचा प्रयत्न मच्छीमार सोसायट्या व सागरी किनारा रक्षक करत आहेत. बोटी खोल समुद्रात गेल्यानंतर त्यांना नौदलाची बोट वाचवू शकते मात्र पावसाळ्यात अपघाताची शक्यता जास्त असते.मासेमारी हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याने त्यांच्या वर पूर्ण पणे रोक लावता येत नाही परंतु गंभीर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा नोंदवतो.-विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक,निसर्गाचा -हास होतोच पण त्यांच्या जीव देखील धोक्यात येतो. पावसाळ्यात वादळ असले की, पेट्रोलिंग देखील बंद असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री नसते.- रवींद्र पाटील, सागरी सुरक्षा अधिकारीखाडी मधील मासेमारी सुरु आहे. ती बंद झालेली नाही मात्र, मच्छीमार जर समुद्रात जात असतील तर तो गुन्हा आहे. काही बोटी लांबच्या दौºयावर गेलेले असतात त्यांना परतण्यास वेळ लागतो म्हणून मासेमारी बंद झाल्यानंतर ही ते समुद्रात दिसतात.- संजय कोळी, अध्यक्ष,मच्छीमार समिती

टॅग्स :Virarविरारfishermanमच्छीमार