शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बळीराजा धास्तावला, वेधशाळेने वर्तविली पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:11 IST

वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून या आठवड्याच्या अखेरीस पालघर जिल्ह्यात वारा व गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीे आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी: वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असून या आठवड्याच्या अखेरीस पालघर जिल्ह्यात वारा व गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीे आहे. त्या मध्ये डहाणू तालुक्याचा समावेश असून बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. या हवामानाचा भाजीपाल्यावर परिणाम होणार असल्याने बळीराजा धास्तावला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ आणि १७ मार्च रोजी वादळ तसेच गडगडाटांसह पावसाची शक्यता असून त्यानंतर १८ व १९ मार्च या दोन दिवसांतही पाऊस पडू शकतो असे म्हटले आहे. या विभागाच्या वेबसाईटवर या बाबतची माहिती दिली आहे. त्याचे पडसाद बुधवारपासून ढगाळ वातावरणाने दिसले.शिवाय प्रचंड उकाडा जाणवत होता. दहावीची परीक्षा देणार्?या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. नागरिकांना डोकेदुखीसह मळमळ आणि प्रकृती अस्वास्थतेचा त्रास जाणवला. या खराब हवामानाचा सर्वात अधिक फटका भाजीपाल्याला बसणार आहे.या हंगामातील मिरची हे प्रमुख पीक आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र मागील चार ते पाच वर्षांपासून झपाट्याने विस्तारले आहे. या पिकाकरिता प्रती एकरी खर्च जास्त असतो. त्या मध्ये पीक संरक्षणासाठी अधिकचे कीटकनाशक फवारावे लागणार असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्यातून बळीराजा पुरता सावरलेला नाही. त्या वेळी झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून उत्पादनात कमालीची घट जाणवत आहे.>बागायतीला मोठा फटकाहवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वाºयासह पाऊस झाल्यास त्याचा फटका वेलवर्गीय व मिरची पीक तसेच सफेदजांबू (जाम), लिची, आंबा आणि नारळ या बागायती पिकांवर होईल. शिवाय सुकीमच्छी आणि ताडी उद्योगालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी