शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

बाडापोखरण पाणी योजना रखडली, २९ गावांतील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:38 IST

डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले

डहाणू : डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले असतांनाच बाडापोखरण प्रादेशिक पाणी योजनेच्या नूतनीकरणाचे काम दोन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होत नसल्याने ही योजना रखडली आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील २६ गावांना तसेच पालघर तालुक्यातील तारापूर, कांबोडे, सावराई अशी एकूण २९ गावांना या योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु २००६ ला बाडापोखरण योजनेच्या जलवाहिनी कालबाह्य झाल्याने त्यावेळी शासनाने योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटीचे अनुदान मंजुर करून ५ मार्च २०१४ ला योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.या कामात ३२ नवीन जलकुंभाबरोबरच वानगांव ते साखरा पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे तसेच गावातील वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी बदलणे इत्यादी कामे संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सुरवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्याने मुदतीत काम पूर्ण झाले नाही. हे काम जूनला पूर्ण होणार होते. परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही जलकुंभ, वॉल, ट्रान्सफार्मर, वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी, मुख्य जलवाहिनी, जलकुंभाचे इनलेट, आऊटलेट, फिनिशिंग इत्यादी बहुसंख्य काम बाकी असल्याने ती केंव्हा पूर्ण होतील असा संतप्त सवाल संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ करीत आहे.दरम्यान जीर्ण व जुनाट झालेल्या जलवाहिन्या वेळीच बदलल्या जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पंधरा, दिवस महिनाभर पाणी साठवून ठेवून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आली आहे.तर ताणसी, ओसरवाडी तसेच धा. डहाणू या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत या योजनेचे पाणीच येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. दोन वेळा म्हणजेच आठ महिने मुदतवाढ देऊनही बाडापोखरण नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.डिसेंबर २०१७ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार असून एक जानेवारी पासून ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात व सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.-अरूण निर्भवणेकार्यकारी अभियंताबाडापोखरण पाणी पुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी