शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

बाडापोखरण पाणी योजना रखडली, २९ गावांतील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:38 IST

डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले

डहाणू : डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले असतांनाच बाडापोखरण प्रादेशिक पाणी योजनेच्या नूतनीकरणाचे काम दोन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होत नसल्याने ही योजना रखडली आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील २६ गावांना तसेच पालघर तालुक्यातील तारापूर, कांबोडे, सावराई अशी एकूण २९ गावांना या योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु २००६ ला बाडापोखरण योजनेच्या जलवाहिनी कालबाह्य झाल्याने त्यावेळी शासनाने योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटीचे अनुदान मंजुर करून ५ मार्च २०१४ ला योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.या कामात ३२ नवीन जलकुंभाबरोबरच वानगांव ते साखरा पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे तसेच गावातील वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी बदलणे इत्यादी कामे संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सुरवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्याने मुदतीत काम पूर्ण झाले नाही. हे काम जूनला पूर्ण होणार होते. परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही जलकुंभ, वॉल, ट्रान्सफार्मर, वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी, मुख्य जलवाहिनी, जलकुंभाचे इनलेट, आऊटलेट, फिनिशिंग इत्यादी बहुसंख्य काम बाकी असल्याने ती केंव्हा पूर्ण होतील असा संतप्त सवाल संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ करीत आहे.दरम्यान जीर्ण व जुनाट झालेल्या जलवाहिन्या वेळीच बदलल्या जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पंधरा, दिवस महिनाभर पाणी साठवून ठेवून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आली आहे.तर ताणसी, ओसरवाडी तसेच धा. डहाणू या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत या योजनेचे पाणीच येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. दोन वेळा म्हणजेच आठ महिने मुदतवाढ देऊनही बाडापोखरण नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.डिसेंबर २०१७ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार असून एक जानेवारी पासून ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात व सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.-अरूण निर्भवणेकार्यकारी अभियंताबाडापोखरण पाणी पुरवठा योजना

टॅग्स :Waterपाणी