शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका हद्दीतील उद्यानांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:12 IST

वसई-विरार शहरात महापालिकेची एकूण १३५ उद्याने आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्च करून उद्यानांचे सुशोभीकरण केले होते.

नालासोपारा : मनपा हद्दीतील उद्यानांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्याला गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून अनेक साहित्याची चोरी झालेली आहे. यामुळे उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे. एकीकडे सेल्फी पॉइंट, चौकांच्या सुशोभीकरणावर मनपा लाखोंची उधळण करत असताना होत असलेल्या कानाडोळ्यामुळे वसईतील अनेक गार्डनची दुर्दशा झाली आहे.

वसई-विरार शहरात महापालिकेची एकूण १३५ उद्याने आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्च करून उद्यानांचे सुशोभीकरण केले होते. त्यात लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य, व्यायामाचे साहित्य, बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली होती. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका महिला बचतगटांना देण्यात आला होता, मात्र या उद्यानांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने शहरातील बहुतांश उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. गार्डनमधील मुलांची खेळणी, व्यायामाचे साहित्य तुटलेले, काही ठिकाणी पाण्याअभावी झाडे सुकली आहेत. 

सेंट्रल पार्क, सनशाइन गार्डन, आचोळे तलाव, मोरेगाव तलाव, फनफिस्टा गार्डन, महेश पार्क, मनवेलपाडा, पापडी, तामतलाव, भास्कर आळी, गोखिवरे, वालीव, धानिबवाग, बोळिंज, छेडानगर या उद्यानांची अवस्था अधिक खराब झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्याचे, व्यायामाचे साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची बाके मोडकळीस आली आहेत. त्यांना ठिकठिकाणी गंज लागला आहे. कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी गवत, झुडपे वाढलेली आहेत. बहुतेक उद्यानांतील दिवे बंद, सुरक्षा यंत्रणा नसल्याने साहित्य चोरीस गेले आहे.

शौचालयाअभावी कुचंबणाकाही उद्यानांत शौचालय आहे, पण अस्वच्छतेने साम्राज्य  आहे. पुरुष कसे तरी झाडाझुडपांमध्ये लघुशंका आटोपून घेतात, पण महिलांना कुचंबणा सहन करावी लागते. काही ठिकाणी शौचालय आहे, पण त्याला टाळे आहे.

मुलांनी खेळावे कुठे?मुलांना विरंगुळा मिळावा म्हणून अनेक पालक सायंकाळच्या सुमारास येथे मुलांना आणतात. मात्र, येथील खेळण्यांचे सर्वच्या सर्व साहित्य तुटलेले आहे. झुले तुटून पडले आहेत, तर घसरपट्टी मोडकळीस आली आहे. अशा खेळण्यांवर कधीही मुलांचा अपघात होण्याची भीती पालकांना असते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार