शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

एडवण शाळेला पालकांचे टाळे

By admin | Updated: August 21, 2015 02:13 IST

एडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर

हितेन नाईक, पालघरएडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून उपाययोजना आखल्या जात नसल्याने उद्विग्न झालेल्या शेकडो पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. एडवण प्रकरणी उद्या तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातील, असे पालघर पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.पालघर पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचा अनेक वर्षांपासून सावळागोंधळ सुरू आहे. जिल्हानिर्मितीनंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी अशी सक्षम यंत्रणा पालघरमध्ये येऊनही शिक्षक बदलीमधील घोटाळा थांबताना दिसत नाही. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये पहिली ते सातवी इयत्तेमध्ये १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटाच्या निकषाप्रमाणे शाळेत एक मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक व चार उपशिक्षक असणे अत्यावश्यक असताना एक निवृत्त मुख्याध्यापक असून शाळेत फक्त चारच शिक्षक कार्यरत आहेत. त्यातच एखाद्या शाळेत शिक्षकांची कमतरता भासल्यास एडवण शाळेतून शिक्षक पाठविला जात असल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार लेखी निवेदने देऊनही याबाबत उपाययोजना आखल्या जात नाहीत. किनारपट्टीवरील १५ ते २० शाळांची अवस्था सध्या बिकट असून पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक पालकांनी मुलांना खाजगी शाळांमध्ये दाखल केले आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. अनेक तक्रारीनंतरही मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या पालकांनी शेवटी एकत्र येत शाळेला टाळे ठोकून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.पालघर शहराजवळील पूर्व भागातील नवली, वेवूर, लोकमान्यनगर तर बोईसरजवळील शिगाव, दांडी, मान, बोईसर इ. आदिवासीबहुल ग्रामीण भागात एकस्तर वेतनश्रेणी भत्ता (विशेष घटक योजनेच्या गावात) मिळत असल्याने राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे काही अधिकारी यांच्याशी साटेलोटे असणाऱ्या अनेक शिक्षकांनी अशा भागातील शाळा बळकाविल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक असून त्यांची संख्या ६५ च्या दरम्यान असल्याचे कळते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी लक्ष घालण्याची पालकांची मागणी आहे.