शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एडवण शाळेला पालकांचे टाळे

By admin | Updated: August 21, 2015 02:13 IST

एडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर

हितेन नाईक, पालघरएडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून उपाययोजना आखल्या जात नसल्याने उद्विग्न झालेल्या शेकडो पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. एडवण प्रकरणी उद्या तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातील, असे पालघर पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.पालघर पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचा अनेक वर्षांपासून सावळागोंधळ सुरू आहे. जिल्हानिर्मितीनंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी अशी सक्षम यंत्रणा पालघरमध्ये येऊनही शिक्षक बदलीमधील घोटाळा थांबताना दिसत नाही. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये पहिली ते सातवी इयत्तेमध्ये १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटाच्या निकषाप्रमाणे शाळेत एक मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक व चार उपशिक्षक असणे अत्यावश्यक असताना एक निवृत्त मुख्याध्यापक असून शाळेत फक्त चारच शिक्षक कार्यरत आहेत. त्यातच एखाद्या शाळेत शिक्षकांची कमतरता भासल्यास एडवण शाळेतून शिक्षक पाठविला जात असल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार लेखी निवेदने देऊनही याबाबत उपाययोजना आखल्या जात नाहीत. किनारपट्टीवरील १५ ते २० शाळांची अवस्था सध्या बिकट असून पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक पालकांनी मुलांना खाजगी शाळांमध्ये दाखल केले आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. अनेक तक्रारीनंतरही मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या पालकांनी शेवटी एकत्र येत शाळेला टाळे ठोकून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.पालघर शहराजवळील पूर्व भागातील नवली, वेवूर, लोकमान्यनगर तर बोईसरजवळील शिगाव, दांडी, मान, बोईसर इ. आदिवासीबहुल ग्रामीण भागात एकस्तर वेतनश्रेणी भत्ता (विशेष घटक योजनेच्या गावात) मिळत असल्याने राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे काही अधिकारी यांच्याशी साटेलोटे असणाऱ्या अनेक शिक्षकांनी अशा भागातील शाळा बळकाविल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक असून त्यांची संख्या ६५ च्या दरम्यान असल्याचे कळते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी लक्ष घालण्याची पालकांची मागणी आहे.