शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:38 IST

Palghar : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयांतर्गत ९वी ते १२वीपर्यंतच्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. कोविडशी संबंधित नियमांचे पालन करून वर्ग सुरू झाले असले, तरी वसतिगृहाचे दरवाजे अद्याप बंदच असल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. त्यानुसार, २७ शासकीय माध्यमिक आणि २१ अनुदानित अशा एकूण ४८ आश्रमशाळा आहेत. शासनाच्या नियमानुसार ९ ते १२ इयत्तांचे वर्ग सुरू करण्याच्या आदेशानुसार शाळांना प्रारंभ झाला आहे.देशासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये सर्वच बंद करण्यात आली होती. गेले जवळपास आठ महिने बंद असलेली शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आता केंद्र आणि राज्य शासनाने कोविडबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू केली जात आहेत. सध्या ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामध्ये वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन इ.बाबत शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.या विभागाने प्रत्येक शाळेला थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटर, तसेच निर्जंतुकीकरण इ.सामुग्री पुरवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकची साधनेही दिली आहेत.

आश्रमशाळांसमोर अडचणी पालघर जिल्हा हा ग्रामीण तसेच आदिवासीबहुल असल्याने जिल्ह्यात सोयी-सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे घर ते शाळा हे अंतर विद्यार्थ्यांना पायी कापावे लागते. त्यातच कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे  वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास होतो. दुपारच्या माध्यान्न भोजनाची व्यवस्था सुरू झालेली नाही, यामुळेही गरीब विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 

वसतिगृहांसमोरील समस्या पालघर जिल्ह्यामधील वसतिगृहे  अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शाळेत जावे लागत आहे. मात्र आता ९वी ते १२ वी वर्ग सुुरू झाल्यानंतर वसतिगृह प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या तरी ही व्यवस्था होईपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

या विभागाच्या डहाणू कार्यालयांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील ९वी ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तेथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. वसतिगृह अद्याप सुरू झालेली नाहीत.- आशिमा मित्तल, डहाणू प्रकल्प अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस