शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:38 IST

Palghar : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयांतर्गत ९वी ते १२वीपर्यंतच्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. कोविडशी संबंधित नियमांचे पालन करून वर्ग सुरू झाले असले, तरी वसतिगृहाचे दरवाजे अद्याप बंदच असल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. त्यानुसार, २७ शासकीय माध्यमिक आणि २१ अनुदानित अशा एकूण ४८ आश्रमशाळा आहेत. शासनाच्या नियमानुसार ९ ते १२ इयत्तांचे वर्ग सुरू करण्याच्या आदेशानुसार शाळांना प्रारंभ झाला आहे.देशासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये सर्वच बंद करण्यात आली होती. गेले जवळपास आठ महिने बंद असलेली शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आता केंद्र आणि राज्य शासनाने कोविडबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू केली जात आहेत. सध्या ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामध्ये वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन इ.बाबत शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.या विभागाने प्रत्येक शाळेला थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटर, तसेच निर्जंतुकीकरण इ.सामुग्री पुरवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकची साधनेही दिली आहेत.

आश्रमशाळांसमोर अडचणी पालघर जिल्हा हा ग्रामीण तसेच आदिवासीबहुल असल्याने जिल्ह्यात सोयी-सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे घर ते शाळा हे अंतर विद्यार्थ्यांना पायी कापावे लागते. त्यातच कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे  वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास होतो. दुपारच्या माध्यान्न भोजनाची व्यवस्था सुरू झालेली नाही, यामुळेही गरीब विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 

वसतिगृहांसमोरील समस्या पालघर जिल्ह्यामधील वसतिगृहे  अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शाळेत जावे लागत आहे. मात्र आता ९वी ते १२ वी वर्ग सुुरू झाल्यानंतर वसतिगृह प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या तरी ही व्यवस्था होईपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

या विभागाच्या डहाणू कार्यालयांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील ९वी ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तेथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. वसतिगृह अद्याप सुरू झालेली नाहीत.- आशिमा मित्तल, डहाणू प्रकल्प अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस