शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

पालघर जिल्ह्यात टँकर लॉबीने केली कृत्रिम पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:37 IST

Palghar News: निसर्गाचे वरदान लाभलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे या जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात.

- जगदीश भोवड (मुख्य उपसंपादक)निसर्गाचे वरदान लाभलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे या जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. जिल्ह्याच्या चार तालुक्यांत एव्हाना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांसह गुजरात राज्याच्या सीमेवरील हा जिल्हा एकीकडे विकासाच्या वाटेवर आहे. पालघर जिल्ह्यात बहुचर्चित बुलेट ट्रेन, मुंबई - बडोदा एक्स्प्रेस वे अशी विकासकामे सध्या सुरू आहेत. वाढवण बंदरासारखा मोठा प्रकल्पसुद्धा जिल्ह्यात येऊ घातला आहे. पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला पालघर दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र जिल्हा झाला. मात्र, जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतरही जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न आजही आ वासून उभे आहेत. आदिवासींसह स्थानिकांचे प्रश्न अद्याप जैसे थे आहेत. 

पालघर जिल्ह्यात सूर्या प्रकल्पासह काही महत्त्वाची धरणेही आहेत. या जिल्ह्यातून मुंबईसह वसई - विरार, मीरा - भाईंदर या भागांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र खुद्द पालघर जिल्ह्यातील नागरिकांचा घसा कोरडाच असल्याचीही स्थिती आहे. यावरून ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असेही बोलले जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, मोखाडा आणि जव्हार या चार तालुक्यांतील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. हे चारही तालुके आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील आहेत. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे आजही दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या पाचवीला पाणीटंचाई पुजलेली असल्याचे चित्र आहे. 

पालघरमधील जव्हार तालुक्याला प्रतिमहाबळेश्वर मानले जाते. मात्र, या तालुक्यातील काही गावांत मार्च महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भागांत जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक कामे अनेक कारणांनी अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रात्री-बेरात्री अंधारात बोअरिंगवर रांग लावण्याचीही वेळ आलेली आहे. यामुळे संबंधित गावांनी स्थानिक प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. दुर्गम आदिवासी डोंगराळ भाग असलेल्या अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असल्याचेही दृश्य दिसून येत आहे.  पावसाचे प्रमाण किती?पालघर जिल्ह्यात यावर्षी एकूण २२६०.०१ मिलिमीटर पाऊस पडला होता. ११३.८ टक्के इतके हे प्रमाण आहे. असे असतानाही पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यांत सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. ६ गावे आणि ३६ पाड्यांत सध्या १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागांत पाणीटंचाईवर अद्याप मात का केली जात नाही, असाही सवाल केला जात आहे. टँकर लाॅबीला पोसण्यासाठी हे सर्व केले जात आहे का, असाही आरोप होत आहे. टँकरवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात.

टॅग्स :water shortageपाणीकपातpalgharपालघर