शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पालघरात माशांची आवक घटली; क्यार चक्रीवादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:27 IST

भात कापणीसाठी खलाशी आले माघारी

पालघर : जिल्ह्यातील वसई ते झाई-बोर्डी या ११० किमी. च्या किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरातील मासेमारी दिवाळीमुळे तर क्यार चक्रीवादळाच्या तडाख्याने बंद आहे. त्यामुळे बाजारातील माशांची सर्व स्तरावरून आवक घटल्याने मत्स्यप्रेमींची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील अर्नाळा, नायगाव, वसई, वडराई, केळवे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू आदी मच्छीमारी गावातून मत्स्यप्रेमींना बोंबील, कोळंबी आदी ताज्या मासळीचा पुरवठा केला जातो. तर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, मुरबे, डहाणू आदी बंदरातून पापलेट, घोळ, दाढा, सुरमई, हलवा आदी माशांचा मोठा पुरवठा होत असतो. परंतु २५ तारखेपासून दिवाळी असल्याने दोन दिवसांपूर्वीच समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व बोटी बंदरात माघारी आल्या होत्या. तसेच सातपाटी, मुरबे, डहाणू, वसई आदी भागातील बोटीत विक्र मगड, तलासरी, मनोर, जव्हार, डहाणू आदी ग्रामीण भागातील ४ ते ५ हजार आदिवासी बांधव खलाशी कामगार म्हणून काम करतात. ते सर्व दिवाळी सणासाठी आणि आपल्या शेतातील भात कापणीच्या कामासाठी घरी परतले आहेत. दिवाळी संपली असली तरी परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्याने बोटीतील खलाशी कामगार मासेमारीसाठी बोटीत जाण्यास तयार नाही. तर दुसरीकडे क्यार चक्र ीवादळाच्या तडाख्याने समुद्र घुसळून निघाल्याने माशांचे थवे दडून बसत असल्याने मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाण्याची जोखीम पत्करायला तयार होत नाहीत. खलाशांचा प्रत्येकी १२ ते १५ हजार महिना पगार, डिझेल, बर्फ, जीवनावश्यक सामग्री आदी सुमारे दीड लाखाचा खर्चही भरून काढणे शक्य होणार नसल्याच्या भीतीने मच्छीमार मासेमारीला जाण्याचे धाडस पत्करण्यास तयार होत नसल्याचे मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या ९ दिवसापासून पूर्णत: मासेमारी ठप्प पडून आहे. अजूनही ढगाळलेले वातावरण आणि मध्येच पाऊस कोसळत असल्याने मासेमारीचे दिवस वाया जात आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा प्रश्नही मच्छीमाराना सतावत आहे.

जिल्ह्यातील मासेमारी गावांव्यतिरिक्त मुंबईच्या छत्रपती मंडई (क्र ॉफर्ड मार्केट) इथे ओखा, पोरबंदर, हावडा (कलकत्ता), रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात मासे मुंबईसह अन्य शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. परंतु क्यार वादळाचा तडाखा बहुतांशी किनारपट्टीला बसल्याने माशांची आवक घटली आहे. परिणामी खोल खाडीतील बोंबील मासे काही प्रमाणात उपलब्ध होत असून मत्स्यप्रेमींना नाईलाजाने त्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना पापलेट, सुरमई आदी ताजा माशांचा पुरवठा होत नसल्याने शीतगृहात साठवलेल्या माशांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.४ नोव्हेंबरपर्यंत क्यारचा धोकासमुद्रात घोंघावत असलेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका हा ४ नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याने समुद्रात मासेमारीला गेले असल्यास तत्काळ माघारी येण्याचे पत्र सहा. मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघर - ठाणे यांनी दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पाठवले आहे. त्यामुळे अजून ४ दिवस बोटी समुद्रात जाऊ शकणार नसल्याने मासळीची आवक पूर्णत: बंद पडणार आहे. यामुळे सध्या उपलब्ध माशांचे भावही चढे आहेत. ५० रु पयांना ५ मिळणाऱ्या बोंबील माशाच्या दराने उचल खात १०० रु पयांना ५ बोंबील असा सध्या भाव सुरू आहे.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ