शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जात पंचायत प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी १६ जणांविरोधात केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 21:29 IST

या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या चिखलडोंगरी गावातीला मांगेला समाजातील जात पंचायतीच्या १६ व इतर कमिटी सदस्यांच्या विरोधात अर्नाळा पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे लोक राहतात. या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्ट बरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगला केवल वैती यांचे विरारमधील चिखल डोंगरी हे त्यांचे मुळगाव असून मुरबाडच्या सासणे येथील निलेश जोशी यांना ते गुरू मानतात व त्यांचेकडे येणे जाणे आहे. मंगला यांचे गुरू निलेश जोशी व गावकरीचे पूर्वीपासून वाद आहेत. त्यामुळे जात पंचायतीने त्यांचेशी कोणीही संबंध ठेवू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या व कुटुंबाचे घरी निलेश जोशी हे येत जात असल्याची माहिती झाली. त्यामुळे गावातील जात पंचायतीने त्यांचे कुटुंबाला ऑक्टोबर २०२१ पासून वाळीत टाकले व त्यांना २५ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. त्यांनी दंड भरला नाही म्हणून त्यांना गावात येण्यापासून व चिखलडोंगरी गावात रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालवण्यापासून वंचित केले होते. तसेच मंगला यांच्या नातेवाईकांच्या मयताला येऊ दिले नाही. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गावातील भारत पाटील, प्रकाश मेहेर, किरण मेहेर, मोतीराम वैती या चौघांनी मंगला यांच्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या पतींना निलेश जोशी यांना गुरू मानणारा गावातील उमेश वैतीला घरी ठेवून घेतल्याचे संशयावरून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. 

मंगला यांनी मंगळवारी रात्री तक्रार देऊन धनेश मेहेर, धनश्याम तांडेल, कौशल्या केशव राऊत, किरण भास्कर मेहेर, हितेश रामचंद्र मेहेर, भारत नारायण पाटील, राजेश रामचंद्र मेहेर, जगदीश काशिनाथ म्हात्रे, मनीष काशिनाथ म्हात्रे, किशोर नारायण पाटील, ईश्वर बबन वैती, प्रभाकर हरिश्चंद्र मेहेर, विशाल जगन्नाथ वैती, प्रकाश मेहेर, किरण नारायण मेहेर, मोतीराम दामोदर वैती व इतर जात पंचायत कमिटी सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार