शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सेना-राष्ट्रवादीला फटका

By admin | Updated: March 10, 2016 01:40 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नगरपालिका गटातून शिवसेनेचे अतुल पाठक यांच्या निसटत्या विजयाने सेनेमध्ये विजयाचे वातावरण पसरलेले असतानाच जिल्हा परिषद

हितेन नाईक,  पालघरजिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नगरपालिका गटातून शिवसेनेचे अतुल पाठक यांच्या निसटत्या विजयाने सेनेमध्ये विजयाचे वातावरण पसरलेले असतानाच जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश निकम यांच्या पराभवाने हा उत्साह पुरता मावळला. काहीसे असेच चित्र मतमोजणीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटातही पहावयास मिळाले. नगरपालिका गटातून मकरंद पाटील यांच्या पराभवाच्या धक्क्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद गटात काशिनाथ चौधरी यांच्या विजयाने अपेक्षित (कि अनपेक्षित) सुखद धक्का दिला. सेनेचे निकम हे २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील विक्रमगड मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यामुळे निकम यांचा हा पराभव निकम यांच्यासह विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यातील सेना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या धक्कादायक निकालानंतर निकम यांनी थेट मातोश्रीवर धाव घेऊन त्याची प्रचिती आणून दिली. जिल्हा नियोजन समितीसाठी ३२ सदस्यांपैकी २३ सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित ९ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी मतमोजणी पार पडली. नगरपालिका गटात राष्ट्रवादी विरुद्ध सेना असा सामना अपेक्षेप्रमाणे रंगला. मात्र नगरपालिका गटात पालघर, डहाणू, जव्हार अशी पालिकामधून २९ नगरसेवक तसेच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या २ नगरसेविका मिळून ३१ नगरसेवक असतानाही २९ मते मिळवून सेनेचे उमेदवार अतुल पाठक हे विजयी झाले. याउलट राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना केवळ २८ च मते मिळाली. सेनेकडे २७ नगरसेवक असताना पाठक यांना २ मते अधिक मिळाल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. नगरपालिका गटात सेना २९ व राष्ट्रवादी २८ मते असे मोजणीनंतरचे चित्र असले तरी दोन्ही पक्षात फाटाफूट झाल्याची चर्चा आहे. पालघर पालिकेच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला तर जव्हार डहाणू पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सेनेला मतदान केल्याची चर्चा आहे. पालिका गटानंतर महापालिका गटाच्या मतमोजणीतून अपेक्षित निकाल लागला. या गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. सेनेचे धनंजय गावडे पराभूत झाले तर बविआचे उमेश नाईक, लॉरेल डायस, हार्दिक राऊत हे प्रत्येकी ३३ मते मिळवून विजयी झाले. जि.प. गटात पाच जागांसाठी सहा उमेदवार होते. यातील पाच युतीचे तर एक राष्ट्रवादीचा होता. ५७ मतदार असलेल्या या गटात ५१ मतदारांनी मतदान केले होते. दोन मते बाद ठरली अशोक भोये, कमलाकर दळवी, विजय खरपडे यांना प्रत्येकी ९ तर दिलीप गाटे यांना १० मते मिळवून ते विजयी झाले. तर सेनेचे प्रकाश निकम आणि राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी यांना प्रत्येकी ६ मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली असता प्रकाश निकम पराभूत झाल्याचे निवडणूक अधिकारी तावडे यांनी घोषित केले.