शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:35 IST

सातवी गणना : घरोघरी भेट देणार प्रगणक

पालघर : केंद्र शासनाच्या सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या गणनेसाठी प्रगणकांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कुटुंबाची व उद्योगांना भेटी देऊन गणना करण्यात येणार असून ही माहिती संकलनाच्या ‘सामाजिक सेवा केंद्र’ या संस्थेची नियुक्ती शासनाने केली आहे. माहिती संकलित करणाऱ्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रथमत: पूर्णपणे पेपरलेस गणना मोबाईल टॅबचा वापर करून करण्यात येणार आहे. सदर गणनेचे क्षेत्रीय काम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले.पहिली आर्थिक गणना १८७७, दुसरी १९८०, तिसरी १९९०, चौथी १९९७, पाचवी २००५, तर सहावी आर्थिक गणना २०१३ या वर्षी झालेल्या आहेत. या गणनेचा उपयोग प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरिता होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनाही माहिती फायदेशीर ठरते. या गणनेमध्ये कुटुंबातील व्यक्ती किती? कुटुंबातील किती सदस्य नोकरी करतात? किती व्यवसाय करतात? घरात उद्योग, व्यवसाय केला जातोय का? या संदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे. एखाद्या घरी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ भाडेकरू असल्यास त्याबाबतची नोंद केली जाणार आहे. याशिवाय आॅटोरिक्षा, भाजीविक्रेते, फेरीवाले, चायनीज गाड्या यांचीही नोंद केली जाणार आहे. या गणनेमध्ये पिकांचे उत्पादन, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण संस्था, निमलष्करी संस्था आणि बाह्य प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी इत्यादी बाबी वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्तरावर माहिती गोपनीय राहणार आहे.माहिती देणे बंधनकारकआर्थिक गणनेचे काम केंद्रातर्फे सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ अन्वये हाती घेण्यात आले असून या अधिनियमानुसार सर्व आस्थापना व कुटुंबांना माहिती देणे बंधनकारक आहे. गणना सुरू असताना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी अचूकपणे माहिती देऊन मोहिमेत सहभागी व्हावे. नागरिकांनी माहिती देऊन गणनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर