शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:35 IST

सातवी गणना : घरोघरी भेट देणार प्रगणक

पालघर : केंद्र शासनाच्या सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या गणनेसाठी प्रगणकांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कुटुंबाची व उद्योगांना भेटी देऊन गणना करण्यात येणार असून ही माहिती संकलनाच्या ‘सामाजिक सेवा केंद्र’ या संस्थेची नियुक्ती शासनाने केली आहे. माहिती संकलित करणाऱ्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रथमत: पूर्णपणे पेपरलेस गणना मोबाईल टॅबचा वापर करून करण्यात येणार आहे. सदर गणनेचे क्षेत्रीय काम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले.पहिली आर्थिक गणना १८७७, दुसरी १९८०, तिसरी १९९०, चौथी १९९७, पाचवी २००५, तर सहावी आर्थिक गणना २०१३ या वर्षी झालेल्या आहेत. या गणनेचा उपयोग प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरिता होणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनाही माहिती फायदेशीर ठरते. या गणनेमध्ये कुटुंबातील व्यक्ती किती? कुटुंबातील किती सदस्य नोकरी करतात? किती व्यवसाय करतात? घरात उद्योग, व्यवसाय केला जातोय का? या संदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे. एखाद्या घरी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ भाडेकरू असल्यास त्याबाबतची नोंद केली जाणार आहे. याशिवाय आॅटोरिक्षा, भाजीविक्रेते, फेरीवाले, चायनीज गाड्या यांचीही नोंद केली जाणार आहे. या गणनेमध्ये पिकांचे उत्पादन, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण संस्था, निमलष्करी संस्था आणि बाह्य प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी इत्यादी बाबी वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्तरावर माहिती गोपनीय राहणार आहे.माहिती देणे बंधनकारकआर्थिक गणनेचे काम केंद्रातर्फे सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ अन्वये हाती घेण्यात आले असून या अधिनियमानुसार सर्व आस्थापना व कुटुंबांना माहिती देणे बंधनकारक आहे. गणना सुरू असताना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी अचूकपणे माहिती देऊन मोहिमेत सहभागी व्हावे. नागरिकांनी माहिती देऊन गणनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर