शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

एैना, घानवळ आश्रमशाळा स्थलांतरीत

By admin | Updated: July 5, 2017 05:59 IST

मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये

हुसेन मेमन/लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये घानवळ ही आश्रमशाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळेत स्थलांतरीत करण्यात आली तर एैना ही आश्रमशाळा विक्रमगड तालुक्यातील जुनी साखरे येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. एैना ही शाळा जव्हार तालुक्यातील वादग्रस्त शाळा म्हणून ओळखली जात होती, दरी खोऱ्यातील शेवटच्या टोकाची नॉट रिचेबल अशी होती. कारण कोठल्याही कंपनीचे मोबाईल तथा दूरध्वनी येथे चालत नाहीत, शाळाही भाड्याच्या कुजक्या खोलीत भरत होती, ही प्राथमिक शाळा असून इ. १ ली ते ७ वी पर्यतचे एकूण १९० विद्यार्थी शिकत होते, त्यातील ९२ विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाने एस.टी.बस द्वारे साखरे येथे पोहोचविले . एैना येथील शाळा हलवू नये म्हणून गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, शाळा हलवू नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला, तसेच काही दिवसापुर्वी माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही शाळा हलवू नये यासाठी कार्यालयावर मोर्चा काढला होतो, मात्र तेथे असणाऱ्या असुविधा तसेच राहण्यापासून ते खाण्यापर्यतच्या येण्या-जाण्याच्या समस्याचा पालकांना व विद्यार्थ्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जव्हार प्रकल्पाच्या अधिकारी पवनीत कौर यांनी ही शाळा स्थलांतरीत करण्याकरीता प्रयत्न सुरू केले होते, मात्र काही ग्रामस्थांचा तर स्थानिक राजकिय नेत्यांचा त्याला विरोध होत होता, त्यामुळे अखेर स्थलांतराची बाब गोपनिय ठेऊन जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मदतीने बंदोबस्तात शाळा स्थलांतर करण्यात आली, यावेळी स्थानिक महिलांनी काही वेळ रस्ता अडवून धरला मात्र आढव यांनी महिलांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करून शाळा साखरा येथे सुखरूप हलविण्यात यश मिळविला. तसेच घानवळ शाळा ही मोखाडा तालुक्यातील शेवटच्या गावातील तुटकी फुटकी शाळा असून भाड्याच्या खोलीत भरत होती, तेथे जाण्या येण्याकरीता रस्तेही नव्हते, जंगलातील शेवटच्या टोकाची शाळा असल्यामुळे तेथेही विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. १ ली ते ७ वीचे े २०३ विद्यार्थी तीमध्ये शिक्षण घेत होते. ती ही शाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळा येथे शासकिय ईमारतीत स्थलांतर करण्यात आली., स्थलांतरण आवश्यकच होते : घानवळ येथून विद्यार्थ्यांना गोंदे शाळे पर्यत नेण्याकरीता कार्यालयाने काहीच सोय न केल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यात २०३ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ४५ मुली व ३० मुले अशी एकूण ७५ विद्यार्थ्यांनी शाळेत नावे नोंदविली तसेच गोंदे व साखरे येथे नविन शाळा व वसतीगृहाची इमारात बांधण्यात आलेली असून दोन्ही जुनी व नवीन शाळा समोर समोर असल्यामुळे मुलींच्या निवासाची सोयही नविन वसतीगृहात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे कर्मचारी सुतार यांनी लोकमतला दिली.शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते, एैना शाळा ही खूपच लांब व दऱ्या खोऱ्यातील शाळा होती तेथे विद्यार्थ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते.