शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

एैना, घानवळ आश्रमशाळा स्थलांतरीत

By admin | Updated: July 5, 2017 05:59 IST

मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये

हुसेन मेमन/लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये घानवळ ही आश्रमशाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळेत स्थलांतरीत करण्यात आली तर एैना ही आश्रमशाळा विक्रमगड तालुक्यातील जुनी साखरे येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. एैना ही शाळा जव्हार तालुक्यातील वादग्रस्त शाळा म्हणून ओळखली जात होती, दरी खोऱ्यातील शेवटच्या टोकाची नॉट रिचेबल अशी होती. कारण कोठल्याही कंपनीचे मोबाईल तथा दूरध्वनी येथे चालत नाहीत, शाळाही भाड्याच्या कुजक्या खोलीत भरत होती, ही प्राथमिक शाळा असून इ. १ ली ते ७ वी पर्यतचे एकूण १९० विद्यार्थी शिकत होते, त्यातील ९२ विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाने एस.टी.बस द्वारे साखरे येथे पोहोचविले . एैना येथील शाळा हलवू नये म्हणून गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, शाळा हलवू नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला, तसेच काही दिवसापुर्वी माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही शाळा हलवू नये यासाठी कार्यालयावर मोर्चा काढला होतो, मात्र तेथे असणाऱ्या असुविधा तसेच राहण्यापासून ते खाण्यापर्यतच्या येण्या-जाण्याच्या समस्याचा पालकांना व विद्यार्थ्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जव्हार प्रकल्पाच्या अधिकारी पवनीत कौर यांनी ही शाळा स्थलांतरीत करण्याकरीता प्रयत्न सुरू केले होते, मात्र काही ग्रामस्थांचा तर स्थानिक राजकिय नेत्यांचा त्याला विरोध होत होता, त्यामुळे अखेर स्थलांतराची बाब गोपनिय ठेऊन जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मदतीने बंदोबस्तात शाळा स्थलांतर करण्यात आली, यावेळी स्थानिक महिलांनी काही वेळ रस्ता अडवून धरला मात्र आढव यांनी महिलांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करून शाळा साखरा येथे सुखरूप हलविण्यात यश मिळविला. तसेच घानवळ शाळा ही मोखाडा तालुक्यातील शेवटच्या गावातील तुटकी फुटकी शाळा असून भाड्याच्या खोलीत भरत होती, तेथे जाण्या येण्याकरीता रस्तेही नव्हते, जंगलातील शेवटच्या टोकाची शाळा असल्यामुळे तेथेही विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. १ ली ते ७ वीचे े २०३ विद्यार्थी तीमध्ये शिक्षण घेत होते. ती ही शाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळा येथे शासकिय ईमारतीत स्थलांतर करण्यात आली., स्थलांतरण आवश्यकच होते : घानवळ येथून विद्यार्थ्यांना गोंदे शाळे पर्यत नेण्याकरीता कार्यालयाने काहीच सोय न केल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यात २०३ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ४५ मुली व ३० मुले अशी एकूण ७५ विद्यार्थ्यांनी शाळेत नावे नोंदविली तसेच गोंदे व साखरे येथे नविन शाळा व वसतीगृहाची इमारात बांधण्यात आलेली असून दोन्ही जुनी व नवीन शाळा समोर समोर असल्यामुळे मुलींच्या निवासाची सोयही नविन वसतीगृहात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे कर्मचारी सुतार यांनी लोकमतला दिली.शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते, एैना शाळा ही खूपच लांब व दऱ्या खोऱ्यातील शाळा होती तेथे विद्यार्थ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते.