शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आरोप-प्रत्यारोप हे तर निवडणुकीतील शस्त्रेच! मुख्यमंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:51 IST

पालघर : नगर परिषद निवडणुकीत विरोधक विकासावर राजकारण करण्यात अपयशी ठरल्याने सांगत त्यामुळेच त्यांच्याकडून वयक्तिक टीका केली जात असल्याचा ...

पालघर : नगर परिषद निवडणुकीत विरोधक विकासावर राजकारण करण्यात अपयशी ठरल्याने सांगत त्यामुळेच त्यांच्याकडून वयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोप-प्रत्यारोप करणे हे निवडणुकीतील शस्त्र आहे. मात्र, नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत असेही ते म्हणाले.पालघरच्या विकासासाठी नगरविकास आणि एमएमआरडीए या विकासाच्या डबल इंजिनाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधी पालघरवासीयांपुढे असून पालघर नगरपरिषद जिंकून आपल्या सत्तेचे हात बळकट करा, मग एकत्र काम करून शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर वासीयांना दिला.पालघर नगरपरिषदेसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार असून नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या डॉ. श्वेता मकरंद पाटील व अन्य महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्याची सभा पालघर मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेना युवानेते आदित्य ठाकरे, बांधकाम आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक, पास्कल धनारे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, ज्योती ठाकरे, श्रीनिवास वणगा, विजय चौगुले, ज्योती मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरात घनकचरा व्यवस्थापन होत नसल्याने डासांची पैदास, डेंग्यू, भुगर्भातील पाणी व शेती खराब झाली आहे. शहरातील घाण पाण्याने ९० टक्के तर उद्योगामुळे १० टक्के प्रदूषण होते. राज्यात शंभराहून अधिक शहरात घनकचरा व्यवस्थापन सुरू केले आहे. शहरांचा डीपीआर पाठवल्यास निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील या निवडणूक जिंकून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत सत्तेत आल्यावर घनकचरा व्यवस्थापन आराखडा तात्काळ तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. तर पालघर जिल्ह्यातील मुख्यालय दोन टप्प्यात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाराजी नको म्हणून उमेदवारी गुलदस्त्यातमुंबई विद्यापीठाचे एक उपकेंद्र पालघरला स्थापून युवकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची नाराजी ओढवू नये यासाठी शिवसेनेनेही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर भ्रष्टावादी काँग्रेस म्हणत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीवर निशाणा साधला. पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या उमेदवारी बाबत वाच्यता करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक