शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोप हे तर निवडणुकीतील शस्त्रेच! मुख्यमंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:51 IST

पालघर : नगर परिषद निवडणुकीत विरोधक विकासावर राजकारण करण्यात अपयशी ठरल्याने सांगत त्यामुळेच त्यांच्याकडून वयक्तिक टीका केली जात असल्याचा ...

पालघर : नगर परिषद निवडणुकीत विरोधक विकासावर राजकारण करण्यात अपयशी ठरल्याने सांगत त्यामुळेच त्यांच्याकडून वयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोप-प्रत्यारोप करणे हे निवडणुकीतील शस्त्र आहे. मात्र, नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत असेही ते म्हणाले.पालघरच्या विकासासाठी नगरविकास आणि एमएमआरडीए या विकासाच्या डबल इंजिनाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधी पालघरवासीयांपुढे असून पालघर नगरपरिषद जिंकून आपल्या सत्तेचे हात बळकट करा, मग एकत्र काम करून शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर वासीयांना दिला.पालघर नगरपरिषदेसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार असून नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या डॉ. श्वेता मकरंद पाटील व अन्य महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्याची सभा पालघर मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सेना युवानेते आदित्य ठाकरे, बांधकाम आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक, पास्कल धनारे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, ज्योती ठाकरे, श्रीनिवास वणगा, विजय चौगुले, ज्योती मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. शहरात घनकचरा व्यवस्थापन होत नसल्याने डासांची पैदास, डेंग्यू, भुगर्भातील पाणी व शेती खराब झाली आहे. शहरातील घाण पाण्याने ९० टक्के तर उद्योगामुळे १० टक्के प्रदूषण होते. राज्यात शंभराहून अधिक शहरात घनकचरा व्यवस्थापन सुरू केले आहे. शहरांचा डीपीआर पाठवल्यास निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. श्वेता पाटील या निवडणूक जिंकून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत सत्तेत आल्यावर घनकचरा व्यवस्थापन आराखडा तात्काळ तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. तर पालघर जिल्ह्यातील मुख्यालय दोन टप्प्यात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाराजी नको म्हणून उमेदवारी गुलदस्त्यातमुंबई विद्यापीठाचे एक उपकेंद्र पालघरला स्थापून युवकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची नाराजी ओढवू नये यासाठी शिवसेनेनेही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यानंतर भ्रष्टावादी काँग्रेस म्हणत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीवर निशाणा साधला. पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या उमेदवारी बाबत वाच्यता करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक