शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रचाराचा सारा ट्रेंडच बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:02 IST

साधने आणि मार्ग बदललेत : सोशल मीडियाला आले महत्व

विक्रमगड : ग्रामीण भागात निवडणुकीचा प्रचार म्हटला की तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फोटो, जाहिरनामे घेऊन आणि रीक्षेला भोंगा लाऊंन त्या गगणभेदी घोषणा देत फिरायचे पण या आधुनिक काळात हे सर्व बदलले आहे. प्रचार ही हायटेक झाला आहे. सोशल मिडिया चा वापर वाढला आहे. पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे.सर्वत्र रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. पूर्वीच्या गगनभेदी घोषणा आता लुप्त झाल्या असून भोंग्यांचा कर्कश आवाज, गाणी, घोषणा यांची जागा घेत सोशल मीडिया. इतर निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा कार्यक्षेत्र आकारमानाने मोठे असल्याने प्रचार करणारे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला गेला आहे. आणि त्याची जागा तात्काळ व जलद गतीच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणांनी जागा घेतली; पण सर्व उमेदवारांचा भर ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर आहे. प्रचाराला कमी दिवसांचा अवधी मिळत असल्याने पूर्वीसारखी दिर्घ रंगत आता पाहायला मिळत नाही. होर्डींग, फ्लेक्स, कटआऊटने जागा व्यापून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न केला जात असून पूर्वी उमेदवारांच्या विश्वासू, निष्ठावान कार्यकर्त्यांची एक फळीच असायची. ते निष्ठेने कार्य करायचे. त्यासाठी ते पदरचा खर्च करायचे. आता मात्र भाडोत्री कार्यकर्त्यांचा जमाना आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत सगळा खर्च करून शिवाय ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना दिले जातात. सगळेच पक्ष हा प्रकार करीत असल्याने एकच कार्य करतात. सकाळी एका पक्षाचा तर दुपारी दुसऱ्या पक्षाचा असल्याचे पहायला मिळते.यामुळे अशा भाडोत्रींची मात्र सध्या चांगलीच चंगळ होत आहे.सोशल मीडिया हे तरु ण मतदारा पर्यन्त पोहचण्याचे प्रभावी माध्यम आहे. पालघर जिल्हातील ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात मतदार सोशल मिडियाचा वापर करतात त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हायटेक प्रचार आणि सोशल मीडिया द्वारे केलेला प्रचार मतदाराणा आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- नीलेश सांबरे, अध्यक्ष,कोंकण विकास मंचया निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीचा प्रचार करत आहोत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारान पर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया ठरत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाद्वारे केलेला प्रचार आमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- सुशील औसरकर, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पालघर

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक