शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रचाराचा सारा ट्रेंडच बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:02 IST

साधने आणि मार्ग बदललेत : सोशल मीडियाला आले महत्व

विक्रमगड : ग्रामीण भागात निवडणुकीचा प्रचार म्हटला की तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फोटो, जाहिरनामे घेऊन आणि रीक्षेला भोंगा लाऊंन त्या गगणभेदी घोषणा देत फिरायचे पण या आधुनिक काळात हे सर्व बदलले आहे. प्रचार ही हायटेक झाला आहे. सोशल मिडिया चा वापर वाढला आहे. पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे.सर्वत्र रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. पूर्वीच्या गगनभेदी घोषणा आता लुप्त झाल्या असून भोंग्यांचा कर्कश आवाज, गाणी, घोषणा यांची जागा घेत सोशल मीडिया. इतर निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा कार्यक्षेत्र आकारमानाने मोठे असल्याने प्रचार करणारे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला गेला आहे. आणि त्याची जागा तात्काळ व जलद गतीच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणांनी जागा घेतली; पण सर्व उमेदवारांचा भर ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर आहे. प्रचाराला कमी दिवसांचा अवधी मिळत असल्याने पूर्वीसारखी दिर्घ रंगत आता पाहायला मिळत नाही. होर्डींग, फ्लेक्स, कटआऊटने जागा व्यापून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न केला जात असून पूर्वी उमेदवारांच्या विश्वासू, निष्ठावान कार्यकर्त्यांची एक फळीच असायची. ते निष्ठेने कार्य करायचे. त्यासाठी ते पदरचा खर्च करायचे. आता मात्र भाडोत्री कार्यकर्त्यांचा जमाना आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत सगळा खर्च करून शिवाय ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना दिले जातात. सगळेच पक्ष हा प्रकार करीत असल्याने एकच कार्य करतात. सकाळी एका पक्षाचा तर दुपारी दुसऱ्या पक्षाचा असल्याचे पहायला मिळते.यामुळे अशा भाडोत्रींची मात्र सध्या चांगलीच चंगळ होत आहे.सोशल मीडिया हे तरु ण मतदारा पर्यन्त पोहचण्याचे प्रभावी माध्यम आहे. पालघर जिल्हातील ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात मतदार सोशल मिडियाचा वापर करतात त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हायटेक प्रचार आणि सोशल मीडिया द्वारे केलेला प्रचार मतदाराणा आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- नीलेश सांबरे, अध्यक्ष,कोंकण विकास मंचया निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीचा प्रचार करत आहोत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारान पर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया ठरत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाद्वारे केलेला प्रचार आमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.- सुशील औसरकर, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पालघर

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक