शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
12
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
13
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
14
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
15
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
16
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
17
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
18
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
20
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:25 IST

कातकरी समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अंत्यत मागासलेला असून त्याच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या योजनांचा लाभ त्याला देऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कातकरी उत्थान अभियाना दरम्यान केले.

पालघर : कातकरी समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अंत्यत मागासलेला असून त्याच्या विकासासाठी शासनाने हाती घेतलेल्या योजनांचा लाभ त्याला देऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कातकरी उत्थान अभियाना दरम्यान केले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनुलोभ संस्थेच्या प्रेरणेने कातकरी उत्थान अभियानास सुरुवात केली असून अनुलोभचे कार्यकर्ते व शासकीय अधिकारी-कर्मचारी एकित्रत येऊन शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.अनुलोभचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे यांनी आपल्या भाषणादरम्यान पालघर जिल्ह्यातील या समाजासाठी शासनाच्या सर्व लोकउपयोगी योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्यासाठी दीड हजार कार्यकर्ते प्रशासनास संपूर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी देशमुख, उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे ,आदिवासी विकास विभाग डहाणू व जव्हार प्रकल्पाधिकारी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एन.जेजुरकर तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व अनुलोभ संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.कातकरी उत्थान अभियान कार्यशाळेत ग्रामविकास विभागाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना व जातीच्या दाखल्यांबाबत सादरीकरण, कृषि विभागाच्या योजना, पशु संवर्धन विभागाच्या योजना, आदिवासी विभागाच्या योजना (वन हक्कासह) तसेच कातकरी समाजाबाबत माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामुळे या समाजातील उत्थानास प्रारंभ होईल, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.जनता व प्रशासन यामधील दुवा साधण्याचे काम अनेक वर्षांपासून अनुलोभ संस्था व त्याचे कार्यकर्ते करीत असून त्यांच्या मार्फत येथील पात्र व गरजू लाभारर्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचिवण्यास मदत होणार आहे. कातकरी समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्व्हे करून त्याअंतर्गत माहिती नमुना तयार करण्यात आला असून या प्रश्नावलीद्वारे गांव पातळीवरील कर्मचाºयांच्या सहभागातून या समाजाचे सखोल र्स्व्हेक्षण करण्यात येइल अशी माहितीही त्यांनी दिली. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक व आरोग्य सेविका या गाव पातळीवरील कर्मचा-यांनी एकत्रितरित्या कातकरी समाजातील प्रत्येक कुटुंबास भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याविषयीची माहिती या नमुन्यात जमा करावी. माहिती जमा करताना कातकरी समाजातील व्यक्तींची सहानभूतीपूर्वक चौकशी करावी व त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल या दृष्टीकोनातून जनजागृती निर्माण करण्याच्या प्रयत्न व्हावेत अशा सूचनाही डॉ.पाटील यांनी कर्मचाºयांना दिल्या.