शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

सर्वच राजकीय पक्षांना पुढील आठवडा ठरणार धावपळीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:54 IST

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़

विक्रमगड: मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असून निवणुकीच्या हालचालींना वेग आला आहे़ मात्र, पालघर लोकसभेसाठी शिवसेना-भाजप आणि बविआ असा चुरसीचा सामना बघावयास मिळणार आहे़ बविआला सहा लाख मतांची बेगमी करावी लागणार आहे.पोटनिवडकीच्या मतांच्या आकडेवारी वरुन भाजपा-शिवसेना युतीकडे त्यांच्या एकत्रित मतांची बेरीज केली तर ५ लाख १५ हजार ९९२ मते होतात. तर बविआकडे स्वत:ची २ लाख २२ हजार मते व माकपाची ७१ हजार ८८७ मते अशा एकुण २ लाख ९४ हजार ७२५ मतांची बविआकडे जुळवणूक झाली आहे़ त्यात कॉगे्रसची ४७ हजार ७१४ मते जमा बेरीज ३ लाख ४२ हजार ४३९ पर्यतच पोहचते उर्वरीत १ लाख ७३ हजार ५५३ मतांचा फरक तोडण्यासाठी बविआला युतीची मते आपल्याकडे खेण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी होण्याची चिन्हे आहेत़ यामध्ये प्रामुख्याने महायुती, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षित आहे़ परंतु उमेदवारांनी मतदारांवर कितीही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला तरी मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचा टिकाव लागणार आहे़ अधिकृतरित्या जाहिर झालेले उमेदवारांची आपला प्रचार सुरु केला असून सभा, रॅली, मतदारांच्या घरोघरी जावून प्रचार सुरु झाला आहे. पूर्वी लोक प्रतिनिधी म्हणून मतदारांनी ज्याच्यावर विश्वास टाकलेला आहे़ त्यांच्या स्थानिक विकास कामाच्या जोरावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे़ २९ एप्रिलला निवडणूक होणार असल्याने रविवार पासून फक्त आठ दिवसांत प्रचारासाठी हातामध्ये उरले आहेत. या आठ दिवसांत आठ तालुके पिंजून काढावे लागणार आहे़ त्यामुळे पुढील आठवडा महत्वाचा ठरणार आहे.>२०१८ च्या पोटनिवडणुकीची स्थिती२०१८ ची पोटनिवडणुक बहुजन विकास आघाडीने त्यावेळेस फारशी गांभीर्याने न घेतल्याने हक्कांची मते शिवसेना व भाजपामध्ये विभागली गेली होती. तसेच, यामध्ये कॉगे्रस तर खुपच दुर होते व राष्टÑवादीची मते देखील शिवसेना व भाजपात विभागली गेली. तसेच राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने देखील भाजपाला फायदा झाला़ तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जावुन इतर पक्षांच्या मतदारांना आपल्याकडे वळविल्यामुळे देखील आणि एकंदरीत ही पोटनिवडणुक प्रतिश्ठेची झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घातल्याने भाजपाला ही बाजी मारता आली होती़माकप, राष्ट्रवादी, कॉग्रेस व बहुजन विकास आघाडी हे एकत्र लढत देत असल्याने पालघर लोकसभा मतदार संघातील डहाणु, तलासरी, जव्हार व विक्रमगड तालुक्यातील काही भागात माकपाचा प्रभाव आहे़ तर काही भाग त्यांचे बालेकिल्ले म्हणुन देखील ओळखले जातात़ आठ महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बविआ व माकप आणि राष्टÑवीदी-कॉग्रेस हे वेगळे लढल्याने बविआ तिसऱ्या तर माकप चौथ्या आणि कॉगे्रस पाचव्या क्रमांकवर होते़ यावेळी त्यांची निशाणी हायजॅक झाल्याने त्यांच्यापुढे नवे संकट असणार आहे.>विक्रमगड विधानसभेतील मतदार करणार नोटा बटनाचा वापरविक्रमगड विधानसभा मतदारसंघातील आदिवासी दºया,खाऱ्यांत राहुन अनेक सुविधाविना पाणी, रोजगार, शिक्षण, दळण-वळण, रस्ते आदी समस्या घेवुन आपले जिवन जगत आलेला आहे़ निवडणुकांत आश्वासना व्यतिरिक्त त्यांना काही मिळत नाही. ़त्यामुळे येथील मतदार नोटाचा वापर करण्याची भुमीका घेणार असल्याचे मतदार बोलत आहेत. तर विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली व अन्य काही गावपाडयातील मतदारांकडुन मतदान करण्यासाठी नाराजीर सुर निघत आहेत. तालुक्यातील अनेक लोक रोजगारासाठी आपल्या कुंटुंबासह इतर षहरांच्या ठिकाणी स्थलांतरी झाल्याने त्यांचाही परिणाम मतदानावर होईल.>पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतउमेदवारांना मिळालेली मतेउमेदवार पक्ष मिळालेली मते1) राजेंद्र गावित भाजपा २७२७८२2) श्रीनिवास वनगा शिवसेना २४३२१०3) बळीराम जाधव बविआ २२२८३८4) किरण गहला माकप ७१८८७5) दामोदर शिगडा कॉग्रेस ४७७१४6) संदिप जाधव अपक्ष ६६७०7) शंकर बदादे अपक्ष ४८८४8) नोटा ---- १६६४४

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर