शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:42 IST

पालघरचे राजकीय समीकरण बिघडले : निष्ठावंत, बंडखोर अपक्ष लढण्याच्या तयारीत

पालघर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरु झाल्याने २८ नगरसेवकांच्या जागांचे गणित बिघडणार आहे. याचा निष्ठावंत शिवसैनिकात संतप्त असून अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अर्ज भरण्याची तयारी चालवली आहे. त्यातच युती झाल्यास जागा वाटपाचे गणितही कोलमडण्याच्या उंबरठ्यावर उभे राहणार असल्याने भाजपकडून २८ उमेदवार तयारीत आहेत.

राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले गटनेते, नगरसेवक मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. श्वेता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका बिंदीया दीक्षित, रेश्मा म्हात्रे, प्रविण मोरे हे पाच नगरसेवक गुरु वारी रात्रौ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून शिवसेने कडून नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून डॉ. श्वेता पाटील यांच्या नावाची घोषणा आणि त्या अन्य नगरसेवकांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या बातमी मुळे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या मध्ये संतप्त भाव उमटत असून राष्ट्रवादीच्या ५ विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहर प्रमुख अस्लम मणियार, माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे, राजू पाटील, अमोल पाटील या पाच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेताना त्यांना नगरसेवक पदाचे तिकीट देण्याच्या अटीवरच घेतले गेले असल्याने निष्ठावान शिवसैनिक आणि उपरे असा वाद निर्माण होणार आहे.विद्यमान नगरपरिषदेत २८ पैकी १७ नगरसेवक शिवसेनेचे असून हे सर्व निष्ठावंत आहेत. त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली असून अन्य पक्षातून आयात केलेल्या १० लोकांना कसे सामावून घेणार हा पेच आहे. त्यातच युती झाल्यास भाजप ने निम्म्या जागांवर आपला अधिकारमागितला असल्याने, मित्रपक्ष आरपीआयला एक-दोन जागा सोडणे गरजेचे असल्याने २८ जागांच्या उमेदवारीचे वाटप कसे करणार असा हा प्रश्न आहे.शिवसेनेचे नगरसेवक गुरुवारी मातोश्रीवर गेल्याने दबावतंत्रमकरंद पाटील आणि डॉ. श्वेता पाटील सह अन्य नगरसेवकांना सेनेत घेण्यास स्थानिक शिवसैनिक, पदाधिकाºयाचा प्रचंड मोठा विरोध आहे. मकरंद पाटील आणि त्यांच्यासह अन्य बाहेरच्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्यायची गरजच काय? असा प्रश्न शिवसैनिका मधून उपस्थित केला जात आहे. माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, अंजली पाटील, उच्च शक्षिति प्राजक्ता वर्दे असे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार सेने कडे असताना बाहेरच्या पक्षातील लोक पक्षात घेण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न घेऊन शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी गुरु वारी मातोश्रीवर गेल्याचे समजते. अश्या परिस्थितीत सेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून सेनेला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह निर्माण होताना दिसत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर