शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत

पालघर/नंडोरे : जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. हा कालावधी मंगळवारपर्यंतचा असू शकतो अशी आॅफ दे रेकॉर्ड माहिती बँकांतूनच मिळू लागल्याने सर्वसामान्य हादरून गेले होते.५०० व १०० रु पयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व पहिल्या दिवशी बँकांसह ए टी एम बंद असल्याने तसेच कोणीही या नोटा स्वीकारत नसल्यामुळे पालघरमध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. दुसऱ््या दिवशी बँका सुरु होतील तेव्हा हाती पैसे येऊन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येईल या आहेत असलेल्या सर्वसामान्य माणसाची आज दुसऱ्या दिवशीही प्रचंड कोंडी झाली. बँकांमधून पैसे मिळविण्यासाठी तासंतास झालेली रखडपट्टी हा कामगार,मध्यमवर्गीय या साऱ्यांसाठी कष्टप्रद अनुभव राहिला पण रोज मजुरी करून आपलं पोट भरणाऱ्या मजुरांच्या कुटुंबासाठी मात्र आजचा दिवस उपासमारीचा ठरला. पैसे आहेत पण ते कुणी स्वीकरत नाहीत. यामुळे उधारी किंवा उपासमार हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्याला बसला असल्याचे यावरून दिसते आहे. काळा पैसा म्हणजे काय याची कल्पनाही नसलेल्या व कधीही काळा पैसा न बाळगणारा प्रामाणिक यात भरडून निघाला.५०० व १००० रु पयांच्या या नोटा बँकेशिवाय कोणीही स्वीकारत नसल्यामुळे आज दुसर्या दिवशीही बाजारपेठा ,भाजी बाजार ,सराफ बाजार थंडावला होता याउलट या नोटा बँकेत जमा करण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी कधीही दिसले नाही अशी अलोट गर्दी बँकांसमोर आज दिसली. या गर्दीला तोंड देता देता बँकाची भंबेरीच उडाल्याचे चित्र दिसले. पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी लोक आज घाई करत होते. एरवी कधीही वेटिंगवर न राहणारेसुद्धा आज पैसे बदलून घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. आज बँकांकडून कमी का असेना फक्त 1000 रु पयांच्याच नोटा ग्राहकांना मिळत होत्या त्यामुळे रोजचा व्यवहार तरी सुकर होईल अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या.पोस्ट आॅफिस बरोबरीने पालघरमधील अर्ध्या डझनहून अधिक बँका आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या.कधीही नसेल तसा आज बँकांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा खच पाहावयास मिळाला . बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांंचीही दमछाक झाली .नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून या पुढे मिहनाभर बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. बँका चालू असल्या तरी एक दोन दिवस पैसे येईपर्यंत ए टी एम मात्र बंद राहणार असल्याचे कळते आहे. (वार्ताहर)