शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत

पालघर/नंडोरे : जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. हा कालावधी मंगळवारपर्यंतचा असू शकतो अशी आॅफ दे रेकॉर्ड माहिती बँकांतूनच मिळू लागल्याने सर्वसामान्य हादरून गेले होते.५०० व १०० रु पयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व पहिल्या दिवशी बँकांसह ए टी एम बंद असल्याने तसेच कोणीही या नोटा स्वीकारत नसल्यामुळे पालघरमध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. दुसऱ््या दिवशी बँका सुरु होतील तेव्हा हाती पैसे येऊन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येईल या आहेत असलेल्या सर्वसामान्य माणसाची आज दुसऱ्या दिवशीही प्रचंड कोंडी झाली. बँकांमधून पैसे मिळविण्यासाठी तासंतास झालेली रखडपट्टी हा कामगार,मध्यमवर्गीय या साऱ्यांसाठी कष्टप्रद अनुभव राहिला पण रोज मजुरी करून आपलं पोट भरणाऱ्या मजुरांच्या कुटुंबासाठी मात्र आजचा दिवस उपासमारीचा ठरला. पैसे आहेत पण ते कुणी स्वीकरत नाहीत. यामुळे उधारी किंवा उपासमार हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्याला बसला असल्याचे यावरून दिसते आहे. काळा पैसा म्हणजे काय याची कल्पनाही नसलेल्या व कधीही काळा पैसा न बाळगणारा प्रामाणिक यात भरडून निघाला.५०० व १००० रु पयांच्या या नोटा बँकेशिवाय कोणीही स्वीकारत नसल्यामुळे आज दुसर्या दिवशीही बाजारपेठा ,भाजी बाजार ,सराफ बाजार थंडावला होता याउलट या नोटा बँकेत जमा करण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी कधीही दिसले नाही अशी अलोट गर्दी बँकांसमोर आज दिसली. या गर्दीला तोंड देता देता बँकाची भंबेरीच उडाल्याचे चित्र दिसले. पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी लोक आज घाई करत होते. एरवी कधीही वेटिंगवर न राहणारेसुद्धा आज पैसे बदलून घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. आज बँकांकडून कमी का असेना फक्त 1000 रु पयांच्याच नोटा ग्राहकांना मिळत होत्या त्यामुळे रोजचा व्यवहार तरी सुकर होईल अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या.पोस्ट आॅफिस बरोबरीने पालघरमधील अर्ध्या डझनहून अधिक बँका आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या.कधीही नसेल तसा आज बँकांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा खच पाहावयास मिळाला . बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांंचीही दमछाक झाली .नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून या पुढे मिहनाभर बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. बँका चालू असल्या तरी एक दोन दिवस पैसे येईपर्यंत ए टी एम मात्र बंद राहणार असल्याचे कळते आहे. (वार्ताहर)