शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

सर्वच एटीएम मंगळवारपर्यंत राहणार बंद?

By admin | Updated: November 11, 2016 02:51 IST

जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत

पालघर/नंडोरे : जोपर्यंत नव्या आणि चलनात असलेल्या नोटांचा मुबलक पुरवठा होत नाही तोपर्यंत सर्वच बँकांची एटीएम बंद राहणार आहेत. हा कालावधी मंगळवारपर्यंतचा असू शकतो अशी आॅफ दे रेकॉर्ड माहिती बँकांतूनच मिळू लागल्याने सर्वसामान्य हादरून गेले होते.५०० व १०० रु पयांच्या नोटा चलनातून अचानक बंद करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व पहिल्या दिवशी बँकांसह ए टी एम बंद असल्याने तसेच कोणीही या नोटा स्वीकारत नसल्यामुळे पालघरमध्ये आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. दुसऱ््या दिवशी बँका सुरु होतील तेव्हा हाती पैसे येऊन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येईल या आहेत असलेल्या सर्वसामान्य माणसाची आज दुसऱ्या दिवशीही प्रचंड कोंडी झाली. बँकांमधून पैसे मिळविण्यासाठी तासंतास झालेली रखडपट्टी हा कामगार,मध्यमवर्गीय या साऱ्यांसाठी कष्टप्रद अनुभव राहिला पण रोज मजुरी करून आपलं पोट भरणाऱ्या मजुरांच्या कुटुंबासाठी मात्र आजचा दिवस उपासमारीचा ठरला. पैसे आहेत पण ते कुणी स्वीकरत नाहीत. यामुळे उधारी किंवा उपासमार हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्याला बसला असल्याचे यावरून दिसते आहे. काळा पैसा म्हणजे काय याची कल्पनाही नसलेल्या व कधीही काळा पैसा न बाळगणारा प्रामाणिक यात भरडून निघाला.५०० व १००० रु पयांच्या या नोटा बँकेशिवाय कोणीही स्वीकारत नसल्यामुळे आज दुसर्या दिवशीही बाजारपेठा ,भाजी बाजार ,सराफ बाजार थंडावला होता याउलट या नोटा बँकेत जमा करण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी कधीही दिसले नाही अशी अलोट गर्दी बँकांसमोर आज दिसली. या गर्दीला तोंड देता देता बँकाची भंबेरीच उडाल्याचे चित्र दिसले. पैसे काढण्यापेक्षा पैसे जमा करण्यासाठी लोक आज घाई करत होते. एरवी कधीही वेटिंगवर न राहणारेसुद्धा आज पैसे बदलून घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. आज बँकांकडून कमी का असेना फक्त 1000 रु पयांच्याच नोटा ग्राहकांना मिळत होत्या त्यामुळे रोजचा व्यवहार तरी सुकर होईल अशा भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या.पोस्ट आॅफिस बरोबरीने पालघरमधील अर्ध्या डझनहून अधिक बँका आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या.कधीही नसेल तसा आज बँकांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा खच पाहावयास मिळाला . बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांंचीही दमछाक झाली .नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून या पुढे मिहनाभर बँका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघड्या राहणार आहेत. बँका चालू असल्या तरी एक दोन दिवस पैसे येईपर्यंत ए टी एम मात्र बंद राहणार असल्याचे कळते आहे. (वार्ताहर)