शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ऐन दिवाळीत मच्छीबाजारात शुकशुकाट; मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:09 IST

कोळीवाड्यात फटाकेच फुटले नाहीत

बोर्डी : क्यार चक्रीवादळाने कहर केल्याने तसेच आर्थिक मंदीमुळे कोळीवाड्यात दिवाळी साजरी झालेली नाही. डोक्यावर कर्ज आणि हाती पैसा नसल्याने ऐन उत्सवात कोळीबांधवांच्या घरात शुकशुकाट आहे. दरम्यान, १ नोव्हेंबरपर्यंत मासेमारीला न जाण्याच्या सूचना असल्या, तरी जीवावर उदार होऊन पोटासाठी समुद्रात जाणार असल्याची प्रतिक्रि या काही मच्छीमारांनी दिली.

१ आॅगस्ट रोजी खोल समुद्रात मासेमारी करण्याची बंदी उठली, तरी पालघर जिल्ह्यातील मच्छीमारी हंगामाचा प्रारंभ नारळीपौर्णिमेनंतर केला जातो. त्यानंतर मोठे उधाण आणि गणेशोत्सवामुळे काही दिवस मासेमारीत खंड पडला होता. आता ऐन दिवाळीत बाजारात माशांना मागणी असते. परंतु क्यार चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मासेमारीला गेलेल्या बोटींना बंदरात येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे इंधन, मजुरी, बर्फ यावर केलेला खर्च वाया गेला आहे. एका बोटीला सरासरी ३० ते ४० किलो पापलेट मिळायचे, तेथे रिकाम्या हाती परतावे लागल्याची माहिती झाई मासेमारी बंदरातील काही मच्छीमारांनी दिली.

दरम्यान, दिवाळीनिमित्त बाजारात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असताना विक्रीसाठी मासे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. कोळी बांधव सण साजरा करण्याऐवजी घरांमध्ये बसले आहेत. त्याचा परिणाम बच्चेकंपनीवरही झाला असून त्यांना फटाके आणून द्यायला पैसे नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. शासनाकडे नेहमीच नुकसान भरपाईची मागणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात ती दिली जात नाही.या व्यवसायाला मंदीचा फटका बसला आहे. बाजारात मागणी असून विक्र ीसाठी मासेच उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येतो. त्यामुळे हाती पैसा नसल्याने कोळी बांधवांनी दिवाळी साजरी केलेली नाही. अशी बिकट परिस्थिती असताना याकडे कोणाचेच लक्ष नाही.- संदेश दवणे, सचिव, झाई मांगेला मच्छिमार सोसायटी

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ