शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

ऐन दिवाळीत मच्छीबाजारात शुकशुकाट; मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:09 IST

कोळीवाड्यात फटाकेच फुटले नाहीत

बोर्डी : क्यार चक्रीवादळाने कहर केल्याने तसेच आर्थिक मंदीमुळे कोळीवाड्यात दिवाळी साजरी झालेली नाही. डोक्यावर कर्ज आणि हाती पैसा नसल्याने ऐन उत्सवात कोळीबांधवांच्या घरात शुकशुकाट आहे. दरम्यान, १ नोव्हेंबरपर्यंत मासेमारीला न जाण्याच्या सूचना असल्या, तरी जीवावर उदार होऊन पोटासाठी समुद्रात जाणार असल्याची प्रतिक्रि या काही मच्छीमारांनी दिली.

१ आॅगस्ट रोजी खोल समुद्रात मासेमारी करण्याची बंदी उठली, तरी पालघर जिल्ह्यातील मच्छीमारी हंगामाचा प्रारंभ नारळीपौर्णिमेनंतर केला जातो. त्यानंतर मोठे उधाण आणि गणेशोत्सवामुळे काही दिवस मासेमारीत खंड पडला होता. आता ऐन दिवाळीत बाजारात माशांना मागणी असते. परंतु क्यार चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मासेमारीला गेलेल्या बोटींना बंदरात येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे इंधन, मजुरी, बर्फ यावर केलेला खर्च वाया गेला आहे. एका बोटीला सरासरी ३० ते ४० किलो पापलेट मिळायचे, तेथे रिकाम्या हाती परतावे लागल्याची माहिती झाई मासेमारी बंदरातील काही मच्छीमारांनी दिली.

दरम्यान, दिवाळीनिमित्त बाजारात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असताना विक्रीसाठी मासे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. कोळी बांधव सण साजरा करण्याऐवजी घरांमध्ये बसले आहेत. त्याचा परिणाम बच्चेकंपनीवरही झाला असून त्यांना फटाके आणून द्यायला पैसे नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. शासनाकडे नेहमीच नुकसान भरपाईची मागणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात ती दिली जात नाही.या व्यवसायाला मंदीचा फटका बसला आहे. बाजारात मागणी असून विक्र ीसाठी मासेच उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येतो. त्यामुळे हाती पैसा नसल्याने कोळी बांधवांनी दिवाळी साजरी केलेली नाही. अशी बिकट परिस्थिती असताना याकडे कोणाचेच लक्ष नाही.- संदेश दवणे, सचिव, झाई मांगेला मच्छिमार सोसायटी

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळ