शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

पाण्यासाठी रणरागिणींचा हंडामोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : डोक्यावर रिकामे हंडे घेऊन असंख्य महिला मोर्चात सहभागी

पालघर : ‘आमचे पाणी आम्हाला, देणार नाही सिन्नरला, पाणी आमचे हक्काचे, लढून आता मिळवायचे’ अशा घोषणा देत मोखाड्यातील रणरागिणी डोक्यावर रिकामा हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी गर्जना करीत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. आमचे घसे कोरडे ठेवून आमचे पाणी सिन्नरला नेण्याचे शासकीय धोरण तत्काळ रद्द करण्याची मागणी या वेळी महिलांनी केली.

मोखाडा तालुक्यातील जनतेची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई, पाच वर्षांपूर्वीपासून या समस्येवर कष्टकरी संघटनेने काही ठोस पर्याय सुचविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याला दिलेल्या भेटीदरम्यान मोखाडा-जव्हार या दोन तालुक्याची पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार कृती योजना आखण्यासाठी व त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येत सर्वेक्षणही झाले होते. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. अंमलबजावणी कशी करायची हेही स्पष्ट झाले. पण गेल्या एक वर्षापासून याकडे कानाडोळा केला जात आहे. मागील सहा महिन्यापासून मोखाडाच्या पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आणि त्यांची टीम सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र जिल्हा प्रशासनाकडून पाणी प्रश्न सुटण्याबाबत योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.

मोखाडा तालुक्यात मोजक्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरीही त्यांचा स्रोत हा विहिरीतल्या पाण्याच्या साठ्यावर असल्याने त्याही उन्हाळ्यात बंद पडतात. डोंगराळ भाग आणि मातीच्या गुणवत्तेमुळे २३४० मिमी एवढा पाऊस पडूनही हे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे विहिरींचे पाणी हे मोखाड्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय नक्कीच नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

प्रमुख मागण्या

अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना मंजूर करा.दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प रद्द करा.मोखाडा तालुक्यासाठी पर्यायीजल आराखडा तयार करा.अस्तित्वात असलेल्या धरणांच्या (वाघ, खोच तुळ्याचापाडा, सायदे) पाण्याचे नियोजन करा.मोखाडातील बहुतांश पाडे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. मार्च-एप्रिल महिना येताच विहीर-बावडी आटायला सुरुवात होऊन पाणीटंचाई भासू लागते.