शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रणरागिणींचा हंडामोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : डोक्यावर रिकामे हंडे घेऊन असंख्य महिला मोर्चात सहभागी

पालघर : ‘आमचे पाणी आम्हाला, देणार नाही सिन्नरला, पाणी आमचे हक्काचे, लढून आता मिळवायचे’ अशा घोषणा देत मोखाड्यातील रणरागिणी डोक्यावर रिकामा हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी गर्जना करीत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. आमचे घसे कोरडे ठेवून आमचे पाणी सिन्नरला नेण्याचे शासकीय धोरण तत्काळ रद्द करण्याची मागणी या वेळी महिलांनी केली.

मोखाडा तालुक्यातील जनतेची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई, पाच वर्षांपूर्वीपासून या समस्येवर कष्टकरी संघटनेने काही ठोस पर्याय सुचविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याला दिलेल्या भेटीदरम्यान मोखाडा-जव्हार या दोन तालुक्याची पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार कृती योजना आखण्यासाठी व त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येत सर्वेक्षणही झाले होते. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. अंमलबजावणी कशी करायची हेही स्पष्ट झाले. पण गेल्या एक वर्षापासून याकडे कानाडोळा केला जात आहे. मागील सहा महिन्यापासून मोखाडाच्या पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आणि त्यांची टीम सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र जिल्हा प्रशासनाकडून पाणी प्रश्न सुटण्याबाबत योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.

मोखाडा तालुक्यात मोजक्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरीही त्यांचा स्रोत हा विहिरीतल्या पाण्याच्या साठ्यावर असल्याने त्याही उन्हाळ्यात बंद पडतात. डोंगराळ भाग आणि मातीच्या गुणवत्तेमुळे २३४० मिमी एवढा पाऊस पडूनही हे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे विहिरींचे पाणी हे मोखाड्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय नक्कीच नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

प्रमुख मागण्या

अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना मंजूर करा.दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प रद्द करा.मोखाडा तालुक्यासाठी पर्यायीजल आराखडा तयार करा.अस्तित्वात असलेल्या धरणांच्या (वाघ, खोच तुळ्याचापाडा, सायदे) पाण्याचे नियोजन करा.मोखाडातील बहुतांश पाडे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. मार्च-एप्रिल महिना येताच विहीर-बावडी आटायला सुरुवात होऊन पाणीटंचाई भासू लागते.