शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

पालघर-खर्डी रेल्वेसाठी जानेवारीत होणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:29 IST

संघर्ष समितीच्या बैठकीत ठराव; नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

विक्रमगड : पालघर स्टेशन तसेच मध्य रेल्वेवरील खर्डी स्टेशन जोडले गेल्यास नव्याने निर्माण झालेला पालघर व नाशिक जिल्हा जोडला जाऊ शकेल. येथील नागरिकांना दळणवळणाचे एक नवे महत्त्वाचे व अतिशय स्वस्त असे पर्यायी साधन उपलब्द्ध होऊन त्याचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच पर्यटकांना होईल असे संघर्ष समितीच्या अभ्यास गटाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.पालघर स्टेशन ते खर्डी स्टेशन हे अंतर सुमारे ८० किलोमीटरचे असून हा रेल्वेमार्ग कमी खर्चात व कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल. या मार्गावरून गुजरात व नाशिककडे जाणारी थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास मुंबईच्या रेल्वे सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत होईल अशी माहिती पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन शेलार यांनी दिली. यासाठी पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असून ही समिती जानेवारीमध्ये मोठे आंदोलन करून लवकरच रेल्वे परिषद घेणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.हा रेल्वे मार्ग विद्यार्थी, तरूण, शेतकऱ्यांना रोजगाराची संधी देणारा तसेच विक्रमगड-वाडा-पालघर येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना व उद्योगव्यवसायांना नवी संजीवनी प्राप्त करून चालना देणारा ठरेल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा विकास झपाट्याने होऊन नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला काही वर्षातच पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.हा रेल्वेमार्ग या भागाचा सर्वांगिण विकास साधणारा असल्याने अत्यंत महत्त्वाचा असा आहे. रेल्वेमार्ग प्रशासनाने मंजूर करून जलदगतीने पूर्ण करावा, अशी विनंती संघर्ष समितीकडून केली आहे. येथे उत्पादित केल्या जाणाºया शेतमालाला जवळची मोठी बाजारपेठ नसल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणेही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी झाल्यामुळे नागरिकांचा शेतजमिनी विकण्याकडे कल वाढत चालला आहे. हा मार्ग झाल्यास या परिसराचा निश्चितच विकास होईल अशी माहिती शेलार यांनी दिली.सुविधांअभावी उद्योगांवर गंडांतरया भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आल्याने अभियंते, कुशल कामगार या भागात नोकरीसाठी येण्याचे टाळतात. त्यामुळे येथील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून येथील बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे.