शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पालघर-खर्डी रेल्वेसाठी जानेवारीत होणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:29 IST

संघर्ष समितीच्या बैठकीत ठराव; नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

विक्रमगड : पालघर स्टेशन तसेच मध्य रेल्वेवरील खर्डी स्टेशन जोडले गेल्यास नव्याने निर्माण झालेला पालघर व नाशिक जिल्हा जोडला जाऊ शकेल. येथील नागरिकांना दळणवळणाचे एक नवे महत्त्वाचे व अतिशय स्वस्त असे पर्यायी साधन उपलब्द्ध होऊन त्याचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच पर्यटकांना होईल असे संघर्ष समितीच्या अभ्यास गटाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.पालघर स्टेशन ते खर्डी स्टेशन हे अंतर सुमारे ८० किलोमीटरचे असून हा रेल्वेमार्ग कमी खर्चात व कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल. या मार्गावरून गुजरात व नाशिककडे जाणारी थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास मुंबईच्या रेल्वे सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत होईल अशी माहिती पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन शेलार यांनी दिली. यासाठी पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असून ही समिती जानेवारीमध्ये मोठे आंदोलन करून लवकरच रेल्वे परिषद घेणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.हा रेल्वे मार्ग विद्यार्थी, तरूण, शेतकऱ्यांना रोजगाराची संधी देणारा तसेच विक्रमगड-वाडा-पालघर येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना व उद्योगव्यवसायांना नवी संजीवनी प्राप्त करून चालना देणारा ठरेल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा विकास झपाट्याने होऊन नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला काही वर्षातच पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.हा रेल्वेमार्ग या भागाचा सर्वांगिण विकास साधणारा असल्याने अत्यंत महत्त्वाचा असा आहे. रेल्वेमार्ग प्रशासनाने मंजूर करून जलदगतीने पूर्ण करावा, अशी विनंती संघर्ष समितीकडून केली आहे. येथे उत्पादित केल्या जाणाºया शेतमालाला जवळची मोठी बाजारपेठ नसल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणेही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी झाल्यामुळे नागरिकांचा शेतजमिनी विकण्याकडे कल वाढत चालला आहे. हा मार्ग झाल्यास या परिसराचा निश्चितच विकास होईल अशी माहिती शेलार यांनी दिली.सुविधांअभावी उद्योगांवर गंडांतरया भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आल्याने अभियंते, कुशल कामगार या भागात नोकरीसाठी येण्याचे टाळतात. त्यामुळे येथील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून येथील बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे.