शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पालघर-खर्डी रेल्वेसाठी जानेवारीत होणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:29 IST

संघर्ष समितीच्या बैठकीत ठराव; नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

विक्रमगड : पालघर स्टेशन तसेच मध्य रेल्वेवरील खर्डी स्टेशन जोडले गेल्यास नव्याने निर्माण झालेला पालघर व नाशिक जिल्हा जोडला जाऊ शकेल. येथील नागरिकांना दळणवळणाचे एक नवे महत्त्वाचे व अतिशय स्वस्त असे पर्यायी साधन उपलब्द्ध होऊन त्याचा लाभ विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच पर्यटकांना होईल असे संघर्ष समितीच्या अभ्यास गटाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.पालघर स्टेशन ते खर्डी स्टेशन हे अंतर सुमारे ८० किलोमीटरचे असून हा रेल्वेमार्ग कमी खर्चात व कमी वेळेत पूर्ण होऊ शकेल. या मार्गावरून गुजरात व नाशिककडे जाणारी थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास मुंबईच्या रेल्वे सेवेवरील ताणही कमी होण्यास मदत होईल अशी माहिती पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन शेलार यांनी दिली. यासाठी पालघर-खर्डी रेल्वे संघर्ष समितीच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आला असून ही समिती जानेवारीमध्ये मोठे आंदोलन करून लवकरच रेल्वे परिषद घेणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.हा रेल्वे मार्ग विद्यार्थी, तरूण, शेतकऱ्यांना रोजगाराची संधी देणारा तसेच विक्रमगड-वाडा-पालघर येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना व उद्योगव्यवसायांना नवी संजीवनी प्राप्त करून चालना देणारा ठरेल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा विकास झपाट्याने होऊन नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला काही वर्षातच पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.हा रेल्वेमार्ग या भागाचा सर्वांगिण विकास साधणारा असल्याने अत्यंत महत्त्वाचा असा आहे. रेल्वेमार्ग प्रशासनाने मंजूर करून जलदगतीने पूर्ण करावा, अशी विनंती संघर्ष समितीकडून केली आहे. येथे उत्पादित केल्या जाणाºया शेतमालाला जवळची मोठी बाजारपेठ नसल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणेही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी झाल्यामुळे नागरिकांचा शेतजमिनी विकण्याकडे कल वाढत चालला आहे. हा मार्ग झाल्यास या परिसराचा निश्चितच विकास होईल अशी माहिती शेलार यांनी दिली.सुविधांअभावी उद्योगांवर गंडांतरया भागात मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आल्याने अभियंते, कुशल कामगार या भागात नोकरीसाठी येण्याचे टाळतात. त्यामुळे येथील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून येथील बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे.