शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

गड, किल्ल्यांच्या समस्यांविरोधात महाराष्ट्रातील दुर्गमित्रांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:38 IST

महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत.

वसई : महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत. विविध माध्यमातून ते गडसंवर्धनासाठी सातत्याने श्रमदान मोहिमा राबवून झटत आहेत. सध्या गडकिल्यांवर कायमस्वरूपी दारूबंदी, प्रेमी युगलांचे अश्लील चाळे रोखणे प्रि-वेडिंग, अश्लील छायाचित्रे काढणे थांबविणे यासाठी आंदोलन केले जाणार आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात तपासणी केंद्रांचा अभाव, रात्री अपरात्री किल्ल्यात होणारे गैरप्रकार इत्यादी प्रश्नांवर पुरातत्व विभाग निव्वळ मौन पाळून आहे. यावर ठोस उपाययोजना करावी. या मागणीसाठी समस्त महाराष्ट्रातील दुर्गमित्रांकडून या आंदोलनाचे शस्त्र उगारण्यात येणार आहे.दुर्गमित्रांनी महाराष्ट्रातील गडकोटांच्या समस्येबाबत विभागवार दिलेल्या निवेदने व विनंतीपत्रे यावर केंद्रीय पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही. गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थिती यावर ठोस उपाययोजना करावी या एकमेव मागणीने समस्त महाराष्ट्रातील दुर्गमित्र एकत्र येऊन वसई किल्ल्यावर १५ व १६ डिसेंबर म्हणजेच शनिवार व रविवारी एल्गार आंदोलन करणार आहेत.दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत समस्त दुर्गमित्र, अभ्यासक केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वसई किल्ल्यातील कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या, निवेदने, प्रतिक्रिया, विनंती पत्रके इत्यादी बाबी मांडणार आहेत.नाशिक, मुंबई, भाईदर, शिरगाव, माहीम, पुणे येथून या आंदोलनासाठी समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी सहभाग नोंदवून आपले जाहीर म्हणणे मांडणार आहेत. त्यातून काय निष्पन्न होते? याकडे सर्व दुर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे..कर्मचारी साधतात स्वार्थसध्या विविध किल्ल्यातील अनेक कर्मचारी वर्ग प्रेमीयुगलांकडून, छायाचित्रकारांकडून अनधिकृत आर्थिक स्वार्थ साधत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत.गडकिल्यांच्या वाढत्या समस्या व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दुर्गमित्रांनी आरंभिलेले हे आंदोलन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्याच्या फलनिष्पत्तीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.