शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

म्हसेपाड्यातील बालिकेच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग; बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:36 IST

दोन नद्यांमुळे तुटतो गावाचा संपर्क

विक्रमगड : तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हसेपाडा  येथील केवळ ४२ दिवसांच्या बालिकेचा रस्त्याअभावी तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११) पहाटे घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी विक्रमगड तहसील कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन बंधाऱ्याचे काम तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र पावसाळा असल्यामुळे हे काम लगेचच कसे पूर्ण होणार, याबाबत ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर तसेच गारगाई व पिंजाळ नदीच्या बेटावर म्हसेपाडा हे गाव वसले आहे. सध्या या म्हसेपाडा गावाची अवस्था अतिशय दयनीय असते. पावसाळ्यातील चार महिने या गावाचा इतर भागाशी संपर्क तुटलेला असतो.  दोन नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने धोकादायक अवस्थेत पोहून किंवा बंधाऱ्यावर फळी टाकून त्यावरून लोकांना ये-जा करावी लागते. याची पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाने आजवर दुर्लक्ष केलेले आहे.

अशा दिल्या सूचनालावण्या नरेश चव्हाण (४२ दिवस) या बालिकेच्या मृत्यूच्या घटनेनंतर बुधवारी विक्रमगड तहसील कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, लघुपाटबंधारे अधिकारी व म्हसेपाडा गावातील ग्रामस्थ यांची बैठक पार पडली. यावेळी अपूर्ण असलेला बंधारा व बंधाऱ्यावर स्लॅबचे काम तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार चारुशीला पवार यांनी लघुपाटबंधारे विभागाला दिले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवून या विभागामध्ये प्राथमिक उपचारासाठी थोड्या प्रमाणात त्या पाड्यात मेडिकल उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. अतिदक्षता म्हणून पूरस्थिती असताना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी या तीरावरून त्या तीरावर न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

रस्त्यासाठी करणार पाठपुरावागारगाव येथे रस्ता मंजूर होणार आहे, त्याचा पाठपुरावाही केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही प्रमुख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे संपर्क नंबर त्या गावात लावण्याचे आदेशही ग्रामपंचायतीला दिले आहेत. विक्रमगड तालुक्यामध्ये काही रस्ते झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तरी उर्वरित जे रस्ते अनकनेक्टेड आहेत, त्याबाबत प्रकल्प कार्यालय, बांधकाम विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.