शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेपाठोपाठ आता भाजपाही ‘वर्षा’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:20 IST

आदिवासींना शंभर टक्के आरक्षण : खासदार कपिल पाटील यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

वाडा : आदिवासी आरक्षणाविरोधात गेल्या चार वर्षांपासून ठाणे पालघर जिल्ह्यातील बिगरआदिवासी समाजात असंतोष खदखदत आहे. त्याला व्यक्त करण्यासाठी मंगळवारी बिगरआदिवासी बचाव हक्क समितीच्या शिष्टमंडळाने शिवसेनेच्या नेत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मात्र याचे श्रेय शिवसेना घेते की काय या भीतीने आज पुन्हा भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्रीनी दिले. एकाच विषयासाठी शिवसेना व भाजपने भेटी घेतल्याने यावर श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ९ जून २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील येणा-या १३ जिल्ह्यात गावपातळीवर काम करणा-या वर्ग ३, वर्ग ४ च्या विविध पदांसाठी आदिवासी समाजाला नोक-यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी केला. तसेच या जिल्ह्यातील क व ड श्रेणीमधील बिगर आदिवासी कर्मचारी हे जिल्ह्याबाहेर बदली होण्याच्या शक्यतेमुळे धास्तावले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठाणे व पालघर जिल्ह्यात बिगरआदिवासी समाज रस्त्यावरील लढाई बरोबरच ते न्यायालयीन लढा देत आहेत.

बिगरआदिवासी पदाधिका-यांनी नुकतीच ठाण्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे आरक्षण बिगर आदिवासीसाठी अन्यायकारक कसे आहे हे पटवून सांगितले.त्यानंतर शिंदे यांनी मंगळवारी(दि.१५)मंत्रालयात शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी, बिगरआदिवासी बचाव हक्क समितीचे पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर लोकसंख्येनुसार नोक-या मिळवण्याचा तेथील जनतेला अधिकार असून त्यांना या विषयावर न्याय देऊ.दोनदा रद्द झालेली अनुसूचित जन जाती सल्लागार समितीची लवकरच सभा घेऊन ६५ टक्के बिगरआदिवासींना न्याय देण्यात येईल .मी वैयिक्तक रित्या या विषयावर लक्ष घालून हा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. शिवसेनेच्या या भेटीनंतर लगेचच शुक्रवारी सकाळी भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.या भेटीतही मुख्यमंत्र्यांनी तेच आश्वासन दिले. अशी माहिती हक्क बचाव समितीचे चंद्रकांत पष्टे यांनी दिली.लोकप्रतिनिधी करतात काय ?जनजाती सल्लागार समिती मध्ये राज्यातील सर्व आदिवासी आमदार सदस्य आहेतया समितीच्या झालेल्या सभांत विविध राजकीय पक्षांचे आमदार या विषयावर बोलले असतील तर त्यांनी सभेचे प्रोसेडिंग जनतेसमोर ठेवावे. अशी मागणी बिगरआदिवासी समाज बांधव करीत आहेत. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा पेटवून मते पदरात पाडण्याचा धंदा बंद करावा अशी मागणी आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा