शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेपाठोपाठ आता भाजपाही ‘वर्षा’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:20 IST

आदिवासींना शंभर टक्के आरक्षण : खासदार कपिल पाटील यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

वाडा : आदिवासी आरक्षणाविरोधात गेल्या चार वर्षांपासून ठाणे पालघर जिल्ह्यातील बिगरआदिवासी समाजात असंतोष खदखदत आहे. त्याला व्यक्त करण्यासाठी मंगळवारी बिगरआदिवासी बचाव हक्क समितीच्या शिष्टमंडळाने शिवसेनेच्या नेत्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मात्र याचे श्रेय शिवसेना घेते की काय या भीतीने आज पुन्हा भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्रीनी दिले. एकाच विषयासाठी शिवसेना व भाजपने भेटी घेतल्याने यावर श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ९ जून २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील येणा-या १३ जिल्ह्यात गावपातळीवर काम करणा-या वर्ग ३, वर्ग ४ च्या विविध पदांसाठी आदिवासी समाजाला नोक-यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी केला. तसेच या जिल्ह्यातील क व ड श्रेणीमधील बिगर आदिवासी कर्मचारी हे जिल्ह्याबाहेर बदली होण्याच्या शक्यतेमुळे धास्तावले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठाणे व पालघर जिल्ह्यात बिगरआदिवासी समाज रस्त्यावरील लढाई बरोबरच ते न्यायालयीन लढा देत आहेत.

बिगरआदिवासी पदाधिका-यांनी नुकतीच ठाण्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे आरक्षण बिगर आदिवासीसाठी अन्यायकारक कसे आहे हे पटवून सांगितले.त्यानंतर शिंदे यांनी मंगळवारी(दि.१५)मंत्रालयात शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी, बिगरआदिवासी बचाव हक्क समितीचे पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर लोकसंख्येनुसार नोक-या मिळवण्याचा तेथील जनतेला अधिकार असून त्यांना या विषयावर न्याय देऊ.दोनदा रद्द झालेली अनुसूचित जन जाती सल्लागार समितीची लवकरच सभा घेऊन ६५ टक्के बिगरआदिवासींना न्याय देण्यात येईल .मी वैयिक्तक रित्या या विषयावर लक्ष घालून हा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. शिवसेनेच्या या भेटीनंतर लगेचच शुक्रवारी सकाळी भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.या भेटीतही मुख्यमंत्र्यांनी तेच आश्वासन दिले. अशी माहिती हक्क बचाव समितीचे चंद्रकांत पष्टे यांनी दिली.लोकप्रतिनिधी करतात काय ?जनजाती सल्लागार समिती मध्ये राज्यातील सर्व आदिवासी आमदार सदस्य आहेतया समितीच्या झालेल्या सभांत विविध राजकीय पक्षांचे आमदार या विषयावर बोलले असतील तर त्यांनी सभेचे प्रोसेडिंग जनतेसमोर ठेवावे. अशी मागणी बिगरआदिवासी समाज बांधव करीत आहेत. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा पेटवून मते पदरात पाडण्याचा धंदा बंद करावा अशी मागणी आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा