शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

विरोधी पक्षाऐवजी वसईत नेमणार सल्लागार समिती

By admin | Updated: July 24, 2015 03:35 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाची वाताहत झाल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाची ताकदही क्षीण झाली आहे

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाची वाताहत झाल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाची ताकदही क्षीण झाली आहे. त्यामुळे महापौर प्रवीणा ठाकूर यांनी सल्लागार समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे पानिपत झाले आणि सभागृहातील संख्याबळ ३० वरून ८ वर आले. ही स्थिती लक्षात घेऊन महापौर ठाकूर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याकरिता मान्यवरांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागार समितीत आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी महापौर, उपमहापौर, माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, माजी विरोधी पक्षनेते, साहित्यिक व कला-क्रीडा प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी स्वत: महापौर प्रवीणा ठाकूर आहेत, तर निमंत्रक म्हणून उपमहापौर उमेश नाईक काम पाहणार आहेत. या समितीच्या सातत्याने बैठका होणार असून या बैठकांत परिसरातील विकासकामांना गती देणे, त्यामध्ये पारदर्शकता निर्माण करणे, प्रशासनाकडे संबंधित विकासकामांचा पाठपुरावा करणे इ. कामे केली जाणार आहेत. अशाच प्रकारच्या समित्या प्रभाग स्तरावरही स्थापन होणार असल्याचे या वेळी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी सांगितले.