शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क, अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; आधुनिक प्रशासनगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:45 IST

वसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपेवसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारण्यासोबतच ठराविक वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांतच संमत होणार आहे.पोर्तुगिजांची हुकुमत उलथवून मराठ्यांनी वसई किल्ला काबिज केला होता. राज्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये वसई किल्ल्याचा पाचवा क्रमांक लागतो. १०९ एकरात पसरलेल्या किल्ल्याचे पावित्र्य सध्या सुरू असलेल्या अवैध प्रकारांनी राखले जात नाही तसेच व्यावसायिक फोटोग्राफीसाठी किल्ल्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार दुर्गप्रेमींनी केली होती. तिची दखल घेऊन पुरातत्व विभागाने किल्ल्यात निर्बंंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारणे आणि सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच प्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिक्षक बिपीनचंद्र नेगी यांनी दिली.प्राचीन वास्तू या विविध संस्कृतींचा वारसा असते. मानवजातीने बनवलेली ही कला आहे. धर्मजातीपलिकडचा हा ठेवा आहे. त्यांचे संरक्षण करणे सामाजिक कार्य आहे. पण, पर्यटक या वास्तूंचे सौदर्य नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे संस्कृती, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंचे जतन, संरक्षण करण्याचे आव्हान पुरातत्व खात्यापुढे असते, असे त्यांनी यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले.वसई किल्ल्यात होत असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी खात्याने कडक धोरण स्वीकारले आहे. प्रवेश शुल्कासोबतच व्यावसायिक फोटोग्राफीलाही शुल्क आकारण्यात येणार आहे. किल्ल्यात अत्याधुनिक पद्धतीचे प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. किल्ल्यात प्रवेशाचे बंधन घातले जाणार आहे. यातून स्थानिक गावकºयांना सूट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सध्या किल्ल्यात एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, फादर फ्रान्सिस कोरीया, आमची वसईचे ऋषिकेश वैद्य, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक मनोज द्विवेदी, नगरसेविका विद्या पाटील, अलका गमज्या, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक, संरक्षक सहाय्यक कैलाश शिंदे उपस्थित होते. आठवडाभर चालणाºया कार्यक्रमात हेरीटेज वॉक, स्वच्छता अभियान, रांगोळी प्रदर्शन, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.तर किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. पेशव्यांनी वसई किल्ला काबिज करून भारतातील परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा इतिहासातील पहिला पराक्रम केला. वसईकरांचा मान उंचावणाºया या घटनेचा साक्षिदार असलेला वसई किल्ल्याची वास्तू अबाधित राहिली पाहिजे. या ऐतिहासिक किल्ल्याचा अभ्यास केला तरच वसईकरांना या वास्तूचे महत्व लक्षात येईल, असे प्रतिपादन प्रथम महापौर राजीव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.पर्यटकांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी चिमाजी अप्पा स्मारक सुशोभिकरण, थ्रीडी थिएटर, लाईट अँड साऊंड शो केले पाहिजेत. पुरातत्व विभागाने प्रस्ताव दिल्यास महापालिकेच्या वतीने ही कामे करता येतील, असेही पाटील यांनीसांगितले.>वसई किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वमराठीचे व्याकरण वसईच्या किल्ल्यात शिकवले गेले. ख्रिस्तपुराणाचा अभ्यास किल्ल्यात केला गेला.वसईचा किल्ला म्हणजे ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे, असे प्रतिपादन फा. फ्रान्सिस कोरीया यांनी यावेळी केले. ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थीआणि उपस्थितांना देण्यात आली.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार