शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क, अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; आधुनिक प्रशासनगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:45 IST

वसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपेवसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारण्यासोबतच ठराविक वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांतच संमत होणार आहे.पोर्तुगिजांची हुकुमत उलथवून मराठ्यांनी वसई किल्ला काबिज केला होता. राज्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये वसई किल्ल्याचा पाचवा क्रमांक लागतो. १०९ एकरात पसरलेल्या किल्ल्याचे पावित्र्य सध्या सुरू असलेल्या अवैध प्रकारांनी राखले जात नाही तसेच व्यावसायिक फोटोग्राफीसाठी किल्ल्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार दुर्गप्रेमींनी केली होती. तिची दखल घेऊन पुरातत्व विभागाने किल्ल्यात निर्बंंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारणे आणि सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच प्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिक्षक बिपीनचंद्र नेगी यांनी दिली.प्राचीन वास्तू या विविध संस्कृतींचा वारसा असते. मानवजातीने बनवलेली ही कला आहे. धर्मजातीपलिकडचा हा ठेवा आहे. त्यांचे संरक्षण करणे सामाजिक कार्य आहे. पण, पर्यटक या वास्तूंचे सौदर्य नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे संस्कृती, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंचे जतन, संरक्षण करण्याचे आव्हान पुरातत्व खात्यापुढे असते, असे त्यांनी यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले.वसई किल्ल्यात होत असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी खात्याने कडक धोरण स्वीकारले आहे. प्रवेश शुल्कासोबतच व्यावसायिक फोटोग्राफीलाही शुल्क आकारण्यात येणार आहे. किल्ल्यात अत्याधुनिक पद्धतीचे प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. किल्ल्यात प्रवेशाचे बंधन घातले जाणार आहे. यातून स्थानिक गावकºयांना सूट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सध्या किल्ल्यात एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, फादर फ्रान्सिस कोरीया, आमची वसईचे ऋषिकेश वैद्य, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक मनोज द्विवेदी, नगरसेविका विद्या पाटील, अलका गमज्या, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक, संरक्षक सहाय्यक कैलाश शिंदे उपस्थित होते. आठवडाभर चालणाºया कार्यक्रमात हेरीटेज वॉक, स्वच्छता अभियान, रांगोळी प्रदर्शन, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.तर किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. पेशव्यांनी वसई किल्ला काबिज करून भारतातील परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा इतिहासातील पहिला पराक्रम केला. वसईकरांचा मान उंचावणाºया या घटनेचा साक्षिदार असलेला वसई किल्ल्याची वास्तू अबाधित राहिली पाहिजे. या ऐतिहासिक किल्ल्याचा अभ्यास केला तरच वसईकरांना या वास्तूचे महत्व लक्षात येईल, असे प्रतिपादन प्रथम महापौर राजीव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.पर्यटकांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी चिमाजी अप्पा स्मारक सुशोभिकरण, थ्रीडी थिएटर, लाईट अँड साऊंड शो केले पाहिजेत. पुरातत्व विभागाने प्रस्ताव दिल्यास महापालिकेच्या वतीने ही कामे करता येतील, असेही पाटील यांनीसांगितले.>वसई किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वमराठीचे व्याकरण वसईच्या किल्ल्यात शिकवले गेले. ख्रिस्तपुराणाचा अभ्यास किल्ल्यात केला गेला.वसईचा किल्ला म्हणजे ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे, असे प्रतिपादन फा. फ्रान्सिस कोरीया यांनी यावेळी केले. ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थीआणि उपस्थितांना देण्यात आली.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार