शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:12 IST

ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़.

विक्रमगड : ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. कारण नगरपंचायतीच्या निर्मितीपासून गेल्या दोन वर्षामध्ये येथील सर्वच पदे रिक्त आहेत एकही पद शासनाने भरलेले नाही़ त्यामुळे सध्या तरी तीचा कारभार हा रिक्तपदांवरच हाकला जात असल्याने विकास कामांना मोठी खीळ बसली आहे़विक्रमगड नगरपंचायतीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सुरु झाला त्यास दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे़ मात्र तो नगरपंचायतीकरीता असलेली १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने नगरपंचायतीतील शासनाने सर्व रिक्त पदे भरा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्या आधी नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियोजितपणे करणे व नगर रचना योजना लागू करुन नियोजनबध्द विकासासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमणे आवश्यक होते. मात्र त्यांचीच उणिव भासते आहे़ फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़विक्रमगड नगरपंचायतीमध्ये यशवंतनगर, टोपलेपाडा, नवापाडा, संगमनगर, शिंपीपाडा, पडवळेपाडा, रोहिदासनगर, गभालेपाडा, दिवेकरवाडी, विक्रमगड, वालीपाडा, कातकरीपाडा, वाकडुचापाडा, पाटीलपाडा समाविष्ट आहेत. सर्व मिळून १० हजार लोकसंख्या असलेली व १७ वॉर्ड असलेली नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे येथे यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालविला जात होता. मात्र या काळात गावाचा विकास होणे. जनतेच्या समस्या, त्यांच्या तक्रारी याचे निराकरण होणे त्यांना मिळणा-या मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अपेक्षित होते. परंतु या पैकी काहीही झालेले नाही. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत अस्तित्वात आली हा प्रशासकीय बदल सोडला तर कशातही फरक पडलेला नाही. त्यामुळे या नगरपंचायतीचे करावे तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विविध प्रश्नांची उकल गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. तशी ती आता नगरपंचायत झाली तरीही झालेली नाही. मग या परीवर्तनाचा उपयोग काय?नगरपंचायतीकरिता शासनमान्य मंजूर पदांचा तपशीलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या विकासासाठी मंजूर पदांमध्ये १)सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री, जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री, जोडारी, १२)शिपाई, १३)मुकादम, १४)व्हॉल्व्हमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी वगळता १५ पदे आहेत. त्यापैकी एकही पदे भरलेले नाही़त्यामुळे आज मितीस या नगरपंचायतीच्या विकासाला खिळ बसलेली आहे़पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण या पदांची भरती महाराष्टÑशासनाकडे आहे. ती भरण्यासंदर्भात मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे़- डॉ़ धीरज चव्हाण,मुख्याधिकारी नगरपंचायतशासनाने शहरीभागातील मुख्य ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला खरा मात्र त्यामध्ये असलेली सर्वच पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतींना सोयी सुविधा पुरविणे, प्रशासकीय मांडणी करणे, नगररचना लागू करणे, गाव-पाडयांचा विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत. -रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार