शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:12 IST

ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़.

विक्रमगड : ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. कारण नगरपंचायतीच्या निर्मितीपासून गेल्या दोन वर्षामध्ये येथील सर्वच पदे रिक्त आहेत एकही पद शासनाने भरलेले नाही़ त्यामुळे सध्या तरी तीचा कारभार हा रिक्तपदांवरच हाकला जात असल्याने विकास कामांना मोठी खीळ बसली आहे़विक्रमगड नगरपंचायतीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सुरु झाला त्यास दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे़ मात्र तो नगरपंचायतीकरीता असलेली १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने नगरपंचायतीतील शासनाने सर्व रिक्त पदे भरा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्या आधी नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियोजितपणे करणे व नगर रचना योजना लागू करुन नियोजनबध्द विकासासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमणे आवश्यक होते. मात्र त्यांचीच उणिव भासते आहे़ फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़विक्रमगड नगरपंचायतीमध्ये यशवंतनगर, टोपलेपाडा, नवापाडा, संगमनगर, शिंपीपाडा, पडवळेपाडा, रोहिदासनगर, गभालेपाडा, दिवेकरवाडी, विक्रमगड, वालीपाडा, कातकरीपाडा, वाकडुचापाडा, पाटीलपाडा समाविष्ट आहेत. सर्व मिळून १० हजार लोकसंख्या असलेली व १७ वॉर्ड असलेली नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे येथे यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालविला जात होता. मात्र या काळात गावाचा विकास होणे. जनतेच्या समस्या, त्यांच्या तक्रारी याचे निराकरण होणे त्यांना मिळणा-या मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अपेक्षित होते. परंतु या पैकी काहीही झालेले नाही. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत अस्तित्वात आली हा प्रशासकीय बदल सोडला तर कशातही फरक पडलेला नाही. त्यामुळे या नगरपंचायतीचे करावे तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विविध प्रश्नांची उकल गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. तशी ती आता नगरपंचायत झाली तरीही झालेली नाही. मग या परीवर्तनाचा उपयोग काय?नगरपंचायतीकरिता शासनमान्य मंजूर पदांचा तपशीलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या विकासासाठी मंजूर पदांमध्ये १)सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री, जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री, जोडारी, १२)शिपाई, १३)मुकादम, १४)व्हॉल्व्हमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी वगळता १५ पदे आहेत. त्यापैकी एकही पदे भरलेले नाही़त्यामुळे आज मितीस या नगरपंचायतीच्या विकासाला खिळ बसलेली आहे़पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण या पदांची भरती महाराष्टÑशासनाकडे आहे. ती भरण्यासंदर्भात मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे़- डॉ़ धीरज चव्हाण,मुख्याधिकारी नगरपंचायतशासनाने शहरीभागातील मुख्य ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला खरा मात्र त्यामध्ये असलेली सर्वच पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतींना सोयी सुविधा पुरविणे, प्रशासकीय मांडणी करणे, नगररचना लागू करणे, गाव-पाडयांचा विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत. -रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार