शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:12 IST

ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़.

विक्रमगड : ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. कारण नगरपंचायतीच्या निर्मितीपासून गेल्या दोन वर्षामध्ये येथील सर्वच पदे रिक्त आहेत एकही पद शासनाने भरलेले नाही़ त्यामुळे सध्या तरी तीचा कारभार हा रिक्तपदांवरच हाकला जात असल्याने विकास कामांना मोठी खीळ बसली आहे़विक्रमगड नगरपंचायतीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सुरु झाला त्यास दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे़ मात्र तो नगरपंचायतीकरीता असलेली १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने नगरपंचायतीतील शासनाने सर्व रिक्त पदे भरा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्या आधी नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियोजितपणे करणे व नगर रचना योजना लागू करुन नियोजनबध्द विकासासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमणे आवश्यक होते. मात्र त्यांचीच उणिव भासते आहे़ फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़विक्रमगड नगरपंचायतीमध्ये यशवंतनगर, टोपलेपाडा, नवापाडा, संगमनगर, शिंपीपाडा, पडवळेपाडा, रोहिदासनगर, गभालेपाडा, दिवेकरवाडी, विक्रमगड, वालीपाडा, कातकरीपाडा, वाकडुचापाडा, पाटीलपाडा समाविष्ट आहेत. सर्व मिळून १० हजार लोकसंख्या असलेली व १७ वॉर्ड असलेली नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे येथे यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालविला जात होता. मात्र या काळात गावाचा विकास होणे. जनतेच्या समस्या, त्यांच्या तक्रारी याचे निराकरण होणे त्यांना मिळणा-या मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अपेक्षित होते. परंतु या पैकी काहीही झालेले नाही. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत अस्तित्वात आली हा प्रशासकीय बदल सोडला तर कशातही फरक पडलेला नाही. त्यामुळे या नगरपंचायतीचे करावे तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विविध प्रश्नांची उकल गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. तशी ती आता नगरपंचायत झाली तरीही झालेली नाही. मग या परीवर्तनाचा उपयोग काय?नगरपंचायतीकरिता शासनमान्य मंजूर पदांचा तपशीलनगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या विकासासाठी मंजूर पदांमध्ये १)सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री, जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री, जोडारी, १२)शिपाई, १३)मुकादम, १४)व्हॉल्व्हमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी वगळता १५ पदे आहेत. त्यापैकी एकही पदे भरलेले नाही़त्यामुळे आज मितीस या नगरपंचायतीच्या विकासाला खिळ बसलेली आहे़पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण या पदांची भरती महाराष्टÑशासनाकडे आहे. ती भरण्यासंदर्भात मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे़- डॉ़ धीरज चव्हाण,मुख्याधिकारी नगरपंचायतशासनाने शहरीभागातील मुख्य ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला खरा मात्र त्यामध्ये असलेली सर्वच पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतींना सोयी सुविधा पुरविणे, प्रशासकीय मांडणी करणे, नगररचना लागू करणे, गाव-पाडयांचा विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत. -रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार