शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रस्त्यावर गॅस वापरणाऱ्यांवर कारवाई; १७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:25 IST

रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाºयांवर वालीव पोलिसांनी करवाई केली आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात हि मोहीम सुरु असून वळीव पोलिसांनी आता पर्यंत १७ जणांवर अटक केली आहे

विरार : रस्त्यावर उघडपणे सिलेंडरचा वापर करून पदार्थ बनवून विकणाºयांवर वालीव पोलिसांनी करवाई केली आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात हि मोहीम सुरु असून वळीव पोलिसांनी आता पर्यंत १७ जणांवर अटक केली आहे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुरु आहे.गरम पदार्थ बनवून विकणे हा नवीन व्यवसाय वसई स्थानकाजवळ जोर धरत आहे. वसई स्थानका बाहेर मोठ्या प्रमाणात ओद्यौगिक इमारती असल्यामुळे याठिकाणी नागरिकांची गर्दी असते. सकाळ संध्याकाळ कामावर जाणाºया व येणाºया लोकांना गरमा गरम नाश्ता पुरविण्या करीता रस्त्यावर उघडपणे सिलेंडर गॅस लावून पदार्थ बनवले जातात. पण हे पदार्थ एखाद्याच्या जीवावर बेतू शकतात. रस्त्यावर उघडपणे गॅस व स्टोव्ह लावून तेलात पदार्थ तळणे हा गुन्हा आहे. तर यामुळे कोणाला हि गंभीर दुखापत होऊ शकते. एखादा पदार्थ तळताना तेल पडू शकते किंवा एखाद्या गाडीला आग लागू शकते इ. गोष्टींमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी वळीव पोलिसांनी अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. हि कारवाई संपूर्ण पालघर जिल्ह्यात सुरु आहे परंतु वसई स्थानक हे अधिक गजबजलेले ठिकाण असल्याने याठिकाणी या फेरीवाल्यांचे प्रमाण जास्त आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास वळीव पोलिसांनी सुरवात केली होती. २०१८ मध्ये पोलिसांनी ५० जणांवर कारवाई केली होती तर २०१९ मध्ये आतापर्यंत १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच वळीव पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.कोणत्याही प्रकारचा सिलेंडर असूदे कायद्याप्रमाणे अटक करण्यात येईल. या फेरीवाल्यंकडे परवाने देखील नसतात यामुळे कोणाचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे या फेरीवाल्यांना लवकर सोडणार नाही. कारवाई पूर्ण झाल्याशिवाय अजिबात आम्ही यांना जाऊ देणार नाही. कारण हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.- दामोदर बांदेकर,पोलीस निरीक्षक, वळीव

टॅग्स :Arrestअटक