शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाणथळ जागेवरील अतिक्रमणावर कारवाई;  १९ कोळंबी प्रकल्प तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:50 IST

पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश

वसई : वसईच्या रानगाव आणि भुईगाव (ता. वसई) येथील पाणथळ जागेवरील पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या अनधिकृत कोळंबी प्रकल्पावर मंगळवारी सकाळी वसई महसूल विभागाने महापालिका आणि वसई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली. येथील १९ कोळंबी प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाईला सुरूवात केली आहे.

२ डिसेंबरपासून सलग चार दिवस वसई पर्यावरण संवर्धन समिती आणि अनेक सामाजिक संस्था, संघटना आदी पर्यावरणप्रेमी संघटनांनी वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालिका, महसूल, महावितरण आणि पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक घेऊन १० डिसेंबर पासून येथील सरकारी तसेच पाणथळ जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करेल, असे लेखी आश्वासन देत हे आंदोलन स्थगित केले गेले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनाची पूर्तता करताना वसई महसूल विभागाने येथील रानगाव आणि भुईगाव किनारपट्टी भागात २००० पासून उभ्या असलेल्या एकूण १९ कोलंबी प्रकल्पांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. या कोलंबी प्रकल्पात ९ प्रकल्प हे रानगाव सोसायटीचे तर १० खाजगी व्यक्तीचे असल्याचे वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंगळवारी सकाळी ६ वा. या कारवाईला सुरुवात झाली. येथील बांध आणि बंधारे तोडून याचे पाणी समुद्राला वळवले. या एकूणच कारवाईत वसई तहसीलदारांसहीत महसूल कर्मचारी अधिकारी, मनपाचे ५० हून अधिकारी आणि ७० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी, अभियंता हे या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते.

या कारवाईमुळे जरी आंदोलनकर्ते आणि पर्यावरण प्रेमींचे जरी समाधान झाले असले तरी या प्रकल्पात काम करणारे जवळपास २ हजार ५०० हून अधिक मजूर वर्ग आता रोजगारापासून वंचित झाला आहे. यापुढे ही तोड कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रांतांनी स्पष्ट केले.या सरकारी पाणथळ जागेवरील कारवाईबाबत रानगाव आणि भुईगाव येथे बºयापैकी मोठे बेकायदेशीर कोलंबी प्रकल्प होते. यात १९ पैकी ३ खाजगी व्यक्तींनी न्यायालयाचे स्थगिती आदेश घेतले. आजच्या पालिका, महसूल आणि पोलीस, महावितरण यांच्या संयुक्त कारवाईत १५ ते १६ प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून बांधबंधारे उद्ध्वस्त करत ते पाणी समुद्राकडे वळवले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहील.- किरण सुरवसे, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार