शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागेवरील अतिक्रमणावर कारवाई;  १९ कोळंबी प्रकल्प तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:50 IST

पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश

वसई : वसईच्या रानगाव आणि भुईगाव (ता. वसई) येथील पाणथळ जागेवरील पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या अनधिकृत कोळंबी प्रकल्पावर मंगळवारी सकाळी वसई महसूल विभागाने महापालिका आणि वसई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली. येथील १९ कोळंबी प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाईला सुरूवात केली आहे.

२ डिसेंबरपासून सलग चार दिवस वसई पर्यावरण संवर्धन समिती आणि अनेक सामाजिक संस्था, संघटना आदी पर्यावरणप्रेमी संघटनांनी वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालिका, महसूल, महावितरण आणि पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक घेऊन १० डिसेंबर पासून येथील सरकारी तसेच पाणथळ जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करेल, असे लेखी आश्वासन देत हे आंदोलन स्थगित केले गेले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनाची पूर्तता करताना वसई महसूल विभागाने येथील रानगाव आणि भुईगाव किनारपट्टी भागात २००० पासून उभ्या असलेल्या एकूण १९ कोलंबी प्रकल्पांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. या कोलंबी प्रकल्पात ९ प्रकल्प हे रानगाव सोसायटीचे तर १० खाजगी व्यक्तीचे असल्याचे वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंगळवारी सकाळी ६ वा. या कारवाईला सुरुवात झाली. येथील बांध आणि बंधारे तोडून याचे पाणी समुद्राला वळवले. या एकूणच कारवाईत वसई तहसीलदारांसहीत महसूल कर्मचारी अधिकारी, मनपाचे ५० हून अधिकारी आणि ७० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी, अभियंता हे या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते.

या कारवाईमुळे जरी आंदोलनकर्ते आणि पर्यावरण प्रेमींचे जरी समाधान झाले असले तरी या प्रकल्पात काम करणारे जवळपास २ हजार ५०० हून अधिक मजूर वर्ग आता रोजगारापासून वंचित झाला आहे. यापुढे ही तोड कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रांतांनी स्पष्ट केले.या सरकारी पाणथळ जागेवरील कारवाईबाबत रानगाव आणि भुईगाव येथे बºयापैकी मोठे बेकायदेशीर कोलंबी प्रकल्प होते. यात १९ पैकी ३ खाजगी व्यक्तींनी न्यायालयाचे स्थगिती आदेश घेतले. आजच्या पालिका, महसूल आणि पोलीस, महावितरण यांच्या संयुक्त कारवाईत १५ ते १६ प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून बांधबंधारे उद्ध्वस्त करत ते पाणी समुद्राकडे वळवले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहील.- किरण सुरवसे, वसई तहसीलदार 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार