शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसईमध्ये १,०७,६५३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:58 IST

तालुक्यातील बेशिस्त वाहनचालकांना दंड : ४ कोटी ८४ लाख ४७ हजार वसूल

मंगेश कराळेn  लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई तालुक्यात वाहतूक विभागाला तुटपुंज्या कर्मचारीवर्गासह वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. वसई वाहतूक विभागाने पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वसई, नालासोपारा, विरारच्या मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करून गेल्या ९ महिन्यांत १ लाख ७ हजार ६५३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून ४ कोटी ८४ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने व अन्य वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक विभागासमोर उभे ठाकलेले आहे. वाहनचालक सर्व कायदे पायदळी तुडवत मनाला वाटेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करतात. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने विरोध केल्यावर वाहनचालक हुज्जत घालून शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. काही वेळा राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास अडचणी निर्माण होतात. तरीही तुटपुंज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक विभागाने हार न मानता गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कारवाई करण्यासाठी कंबर कसून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण राखतात ७६ पोलीसवसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांतील रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी फक्त ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. तुटपुंज्या पोलीस 

कोरोनामुळे रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीत वाढ झाली आहे. आयुक्तालय झाल्याने वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गाची संख्या लवकरच वाढणार आहे. लॉकडाऊन काळात १ लाखापेक्षा जास्त केसेस केल्या आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली भंगार वाहने उचलून एका ठिकाणी जमा करण्यात आली आहेत. अनधिकृत रिक्षा, बिनापरवाना, फॅन्सी नंबर, नंबर न टाकलेल्या वाहनांवर नेहमी कारवाई सुरू आहे.- विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसईबळावर वाहतूककोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ होते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यावर धावणारी वाहने या सर्वांसाठी तुरळक वाहतूक पोलीस असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस