शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पुलावरील धोकादायक वळणामुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:00 IST

चारोटीकरांच्या सहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा; २२ मार्च २०१४ ला येथेच झाला होता टँकरचा भीषण स्फोट

कासा : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास भरु च (गुजरात) कडून मुंबईकडे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचा चारोटी उड्डाणपूलावर गाडीचा ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात झाला. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच होरपळून मृत्यु झाला तर रस्त्याच्या बाजूला उभे असणारे ४ प्रवासी यात जखमी झाले होते.या घटनेनंतर या ठिकाणी तब्बल २ ते ३ तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टँकरमधे हायड्रोजन गॅसच्या १३३ टाक्या होत्या. त्यापैकी केवळ ३ टाक्यांचाच स्फोट झाल्याने २ किमी अंतरापर्यन्त त्याचा आवाज ऐकू येत होता. ही दुर्घटना काही प्रमाणात कमी झाली. तरी कदाचित आणखी काही टाक्यांचा स्फोट झाला असता तर मोठी जीवित हानी होण्याची भीती होती परंतु एक मात्र नक्की हे सर्व बघुन चारोटी करांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.२२ मार्च २०१४ रोजी याच ठिकाणी रसायन टँकर पलटी होऊन स्फोट झाला होता. त्यामध्ये ८ जणांचा बळी गेला होता या मध्ये कैनाड येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४ जण जखमी झाले होते. पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सरा हॉटेलचे पूर्णत: जळून गेले होते. या घटनेनंतर सहा वर्षा पूर्वी चारोटी या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा ठेका असणाºया आयआरबी कंपनीने मागणीची अंमलबजावणी करत याठिकाणी पुलाचे काम पूर्ण केले.पुलाच्या उभारणीनंतर या ठिकाणच्या अपघातांना पायबंद न बसता त्यात वाढ झाली आहे. गत महिन्याभरात कार पुलावरून पडली व दोन मोटारसायकल चा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या पुलावर दोन्हीही बाजून चुकीच्या पद्धतीने तीव्र उतार व धोकेदायक वळण दिले आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणाहून वेगाने जाणारी वाहने उलटतात याच महामार्गाने रोजच्या रोज अनेक ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या ही लक्षणीय असते. पुलावर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्याने हे ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे टँकर वेगाने धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वास्तविक पाहता महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या लक्षणीय असल्याकारणाने सदर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे शक्य असताना देखील आयआरबी प्रशासनाने त्या बाबतीत तशी तरतूद का केली नाही असा प्रश्न चारोटी वासिय नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान या बाबत एन एच आय टेक्निकल मॅनेजर दिनेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावर उतार व चढणीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टर्न दिला आहे.तो वाहन चालकाच्या लक्षात येत नाही त्यामुळे अपघात होतात.आनंदराव काळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कासा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा