शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

पुलावरील धोकादायक वळणामुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:00 IST

चारोटीकरांच्या सहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा; २२ मार्च २०१४ ला येथेच झाला होता टँकरचा भीषण स्फोट

कासा : मुंबई अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास भरु च (गुजरात) कडून मुंबईकडे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचा चारोटी उड्डाणपूलावर गाडीचा ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात झाला. यामध्ये ट्रक चालकाचा जागीच होरपळून मृत्यु झाला तर रस्त्याच्या बाजूला उभे असणारे ४ प्रवासी यात जखमी झाले होते.या घटनेनंतर या ठिकाणी तब्बल २ ते ३ तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टँकरमधे हायड्रोजन गॅसच्या १३३ टाक्या होत्या. त्यापैकी केवळ ३ टाक्यांचाच स्फोट झाल्याने २ किमी अंतरापर्यन्त त्याचा आवाज ऐकू येत होता. ही दुर्घटना काही प्रमाणात कमी झाली. तरी कदाचित आणखी काही टाक्यांचा स्फोट झाला असता तर मोठी जीवित हानी होण्याची भीती होती परंतु एक मात्र नक्की हे सर्व बघुन चारोटी करांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.२२ मार्च २०१४ रोजी याच ठिकाणी रसायन टँकर पलटी होऊन स्फोट झाला होता. त्यामध्ये ८ जणांचा बळी गेला होता या मध्ये कैनाड येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४ जण जखमी झाले होते. पाच गाड्या पेटल्या होत्या व अप्सरा हॉटेलचे पूर्णत: जळून गेले होते. या घटनेनंतर सहा वर्षा पूर्वी चारोटी या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा ठेका असणाºया आयआरबी कंपनीने मागणीची अंमलबजावणी करत याठिकाणी पुलाचे काम पूर्ण केले.पुलाच्या उभारणीनंतर या ठिकाणच्या अपघातांना पायबंद न बसता त्यात वाढ झाली आहे. गत महिन्याभरात कार पुलावरून पडली व दोन मोटारसायकल चा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या पुलावर दोन्हीही बाजून चुकीच्या पद्धतीने तीव्र उतार व धोकेदायक वळण दिले आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणाहून वेगाने जाणारी वाहने उलटतात याच महामार्गाने रोजच्या रोज अनेक ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या ही लक्षणीय असते. पुलावर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्याने हे ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे टँकर वेगाने धावत असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वास्तविक पाहता महामार्गावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाºया टँकरची संख्या लक्षणीय असल्याकारणाने सदर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे शक्य असताना देखील आयआरबी प्रशासनाने त्या बाबतीत तशी तरतूद का केली नाही असा प्रश्न चारोटी वासिय नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान या बाबत एन एच आय टेक्निकल मॅनेजर दिनेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावर उतार व चढणीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टर्न दिला आहे.तो वाहन चालकाच्या लक्षात येत नाही त्यामुळे अपघात होतात.आनंदराव काळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कासा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा