शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:09 IST

आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे.

- हुसेन मेमनजव्हार : आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. केवळ एकाच दिवसापूरता आखाजी साजरा केली जात असल्याने ग्रामीण भागातूनही तो हद्दपार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.स्मार्टफोनमुळे ग्रामीण जीवन आधुनिक व सुकर झाले आहे. अक्षयतृतीय अर्थात आखाजी हा आदिवासी भागातील मोठा सण मानला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये या सणाचे गांभीर्य काही वर्षांपासून कमी होत असून दरवर्षी ते प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या परिसरात राब लावणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांसह महिला व पुरुष मजूर दिवसभर शेतातच राबत आहेत. त्यामुळे गावे ओस पडली आहेत. एकुणच आधुनिक जिवनशैली मुळे संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. घराघरात अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे झोके खेळणारी मुले, मुली मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. विविध मोबाईल कंपन्यांची इंटरनेट सेवा ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे मुला-मुलींसह महिलांनाही मोबाईलवरील विविध गेम ने वेड लावले आहे. त्यामुळे आखाजीच्या निमित्ताने गावातील गल्ल्यांमध्ये विशेषत: तरुणी व महिलांची रेलचेल दिसणे दुरापास्त झाले आहे.आंब्याचा गोडवाही महागलाआखाजीच्या गोडधोड जेवणात आंब्याचे महत्व असते. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे मोहोर गळाल्याने फळधारणेला उशीर झाला. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून आंबा दाखल झाला आहे. सध्या आंब्याची कमीतकमी १५० रु पये किलोपासून विक्र ी सुरू असल्याने तो सर्वसामान्याना परवडेनासा झाला आहे.झाडे नसल्याने झोकेच गायब...- झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी शासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. परंतु काही वर्षांपासून चौकातली झाडेही हळूहळू नामशेष झाली आहेत. आखाजी म्हटल्यावर माहेरवाशिणी आपल्या गावी आल्यानंतर झोके खेळतात. आता गावात झाडेच नसल्याने आखाजी चा झोका कुठे बांधायचा हाही प्रश्न उद्भवत आहे. शेतात बांधलेल्या दोन चार झोक्यांखेरीज गावात सद्यस्थितीत कुठेच झोके दिसून येत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार