शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

६१ गाव पाड्यात पाणीबाणी

By admin | Published: April 26, 2017 12:03 AM

मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत

रवींद्र साळवे / मोखाडामोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत असून धामणशेत बेहटवाडी उंबरपाडा सावरपाडा रामडोह नाशेरा कुवरची वाडी या सात गावपाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत. मोखाड्यातील ६१ गाव पाडे पाणीटंचाईग्रस्त असून त्यापैकी थोड्याच गावपाड्यांना १९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या दिवसा गणिक वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात टंचाई ग्रस्त गावपाड्याची संख्या ९० च्या आसपास होती परंतु यावर्षी मात्र टंचाईग्रस्त गावपाडयाची संख्या शंभर वर पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विहिरी कोरड्या पडल्याने टेंभीखोडावेवर दुष्काळाचे सावट सफाळे : या विभागातील टेंभीखोडावे, कांद्रे, विठ्ठलवाडी या गावातपाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भर उन्हाळ्यात गावातील महिला व मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील तिन्ही विहीर कोरड्या पडल्या आहेत. महिलांना तासनतास पाणी भरण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. टेंभीखोडावे व त्या लगतच्या परिसरातील कुटुंबातील प्रत्येकाला पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.या गावाची लोकसंख्या सुमारे २३०० ते २४०० च्या घरात आहे. गावात ३ विहीरी असून सर्व नागरिकांना त्यांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. उन्हाळा चालू होताच त्या कोरड्या पडण्यास सुरुवात होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विहिरीचे पाणी आटले आहे. पाणी भरण्यासाठी येथील महिलाना २-३ तास वाट पहावी लागते. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने गावात बोअरवेल खोदली होती, तीही कोरडी पडली आहे.गावातील जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी गावा लगत असणाऱ्या तलावावर जावे लागत होते. परंतु यंदा तो ही आटला आहे. सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतीने काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या शुद्ध पेय जल योजने मधून पाण्याचे जार विकत आणून स्थानिकांना सध्या स्वता:ची तहान भागवावी लागते.