शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

माजी सभापती म्हात्रेंसह ६ जणांना सक्तमजुरी

By admin | Updated: January 10, 2017 05:45 IST

कामण येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखाची गेली २५ वर्ष सुरु असलेली न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली असून, याप्रकरणी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या

वसई : कामण येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखाची गेली २५ वर्ष सुरु असलेली न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली असून, याप्रकरणी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह सहा जणांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा वसईच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली आहे. २७ जून १९९१ ला रात्री ८.१५ च्या दरम्यान परागदिन जयस्वाल,राधेशाम जयस्वाल,घनशाम जयस्वाल या तिघांनी जमीनीच्या वादातून आपल्या घरावर ५०-६० जणांच्या जमावासह सशस्त्र हल्ला केला. त्यांनी घराला घेरले, महिलांना अश्लिल शिवीगाळ केली आणि घर जाळून टाकण्याची धमकी दिली.अशी तक्रार लक्ष्मण उर्फ आप्पा विरारकर यांनी वसई पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यामुळे आप्पा विरारकर यांनी वसई न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.या फिर्यादीवर सुनावणी होवून तब्बल २५ वर्षे ६ महिने आणि ६ दिवसांनी निकाल लागला आहे. आरोपींच्या वतीने नेत्रा नाईक यांनी तर सरकार पक्षातर्फे संजय समेळ यांनी केलेला युक्तीवाद विचारात घेवून आरोपींनी फिर्यादीला भीती दाखवण्याच्या हेतूने त्याच्या मालमत्तेला क्षती पोहोचवण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच त्यांनी याच उद्देशाने बेकायदा जमाव जमवला आणि प्राणघातक हत्यारासह ते सज्ज होते. त्यामुळे त्यांनी आणखी एक गुन्हा केला आहे,असा निष्कर्ष न्यायालयाने काढून हा आदेश दिला.आरोपी राधेशाम जयस्वाल, घनशाम जयस्वाल,अजय मदने,प्रभाकर दामोदर म्हात्रे, सुरेश म्हात्रे,प्रकाश म्हात्रे यांना या प्रकरणी दोषी ठरविले असून, प्रत्येकी एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोेन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा महत्वपूर्ण निकाल वसईचे न्याय दंडाधिकारी मा.ये.वाघ यांनी दिला आहे. तसेच आरोपींकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यावर त्यातील ९ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्यात यावे. आरोपींचे जामीनपत्र समर्पित करावे. हा आदेश ठाण्याच्या तुरुंगाधिकाऱ्यांना कळवण्यात यावा, असा निकालही न्यायालयाने यावेळी दिला. (प्रतिनिधी)

शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रभाकर म्हात्रे हे तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत. तसेच कामण गावचे माजी सरपंच देखिल आहेत. पूर्वी जनता दलात विविध पदांवर कार्यरत असलेले म्हात्रे सध्या बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत. तर फिर्यादी आप्पा विरारकर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आहेत.त्यामुळे राजकिय दृष्टीकोनातूनही या प्रकरणाकडे पाहिले जात होते.न्याय प्रक्रियेवर माझा संपूर्ण विश्वास आहे.त्यामुळेच २५ वर्षे दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला. अशी प्रतिक्रिया विरारकर यांनी दिली. या प्रकरणी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.