शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

५०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:00 IST

गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टी : प्राथमिक अंदाज, शेतजमीन खरडून गेल्याने फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, नेर, पुसद या सात तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या तालुक्यात एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्याने तर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २०० पट अधिक आहे. अतिपावसाचा पिकांना जबर फटका बसला आहे. कृषी मालाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेत जमिनीतूनच पूर गेल्याने पिके खरडून गेली आहे. जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मालमत्तांचे नुकसान न मोजता येण्याजोगे आहे.नदी, नाल्यांना आलेला पूर, फुटलेले कालवे आणि खोलगट भागामुळे जिल्ह्यात ६१ हजार ९३० हेक्टरवरील पीक खरडून गेले आहे. हेक्टरी ५० हजारांप्रमाणे ३०९ कोटी रूपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून हेक्टरी नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. २०० किमी रस्ते पुरामुळे वाहून गेले आहेत. दुरूस्तीसाठी २५ कोटी रूपयांचा निधीची गरज आहे.कालवे दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. सहा हजार ७०६ घरांची पडझड झाली. ५० हजारांप्रमाणे हे नुकसान ३३ कोटींच्या घरात आहे. २५९ जनावरे वाहून गेली आहे. तिघांचा मृत्यू झाला. ७९ लाख ७५ हजार रूपयाची मदत वितरित केली गेली. यात धान्य, कपडे, भांडे, केरोसीनचा समावेश आहे.वीज वितरण कंपनीचेही नुकसानपूर पीडित क्षेत्रात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. अनेक खांब कोलमडले, तारा तुटल्या. यातून वीज वितरण कंपनीला तब्बल ५० लाख रूपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती