शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी

By admin | Updated: October 14, 2015 02:13 IST

या जिल्ह्णातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना थेट ५ टक्के निधी देण्याच्या शासनाच्या योजनंअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला सर्वाधिक ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. चा निधी उपलब्ध झाला आहे.

पालघर : या जिल्ह्णातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना थेट ५ टक्के निधी देण्याच्या शासनाच्या योजनंअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला सर्वाधिक ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. चा निधी उपलब्ध झाला आहे. तर सर्वात कमी निधी पालघर तालुक्यातील पथराळी ग्रामपंचायतीला ८७ हजार ७३१ इतका प्राप्त झाला आहे.अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना ५ टक्के थेट निधी देण्याच्या शासन योजनेअंतर्गत तलासरी ग्रामपंचायतीला तर त्या खालोखाल आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे गाव असलेल्या वाडा ग्रामपंचायतीच्या १६ हजार ७५० इतक्या लोकसंख्येसाठी ४७ लाख ७१ हजार ९८ इतका निधी प्राप्त झाला आहे. पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायतीच्या १० हजार ४२१ लोकसंख्येकरीता २९ लाख ६८ हजार ३३५ रू देण्यात आले.डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येकरीता १३ हजार ६४६ लोकसंख्येकरीता सर्वाधिक ३८ लाख ८६ हजार ९४९ रू., वसई तालुक्यातील भाताणे ग्रामपंचायतीच्या ५ हजार ९१७ लोकसंख्येकरीता १६ लाख ८५ हजार ४०८ रू., विक्रमगड तालुक्यातील दादडे ग्रामपंचायतीच्या ६ हजार ८०२ लोकसंख्येकरीता १९ लाख ३७ हजार ४९३ रू., मोखाडा तालुक्यातील मोखाडा ग्रामपंचायतीच्या १० हजार २७३ लोकसंख्येकरीता २९ लाख २६ हजार १७८, जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक कासरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ हजार ३१९ लोकसंख्येसाठी २६ लाख ५७ हजार २८८ रू. निधी प्राप्त झाला आहे. सर्वात जास्त निधी तलासरीला ५३ लाख ३२ हजार ८०६ रू. तर सर्वात कमी पालघर तालुक्यातील पथराळी ग्रामपंचायतीच्या ३०८ लोकसंख्येकरीता ८७ हजार ७३१ इतका निधी प्राप्त झाला आहे. वरील सर्व निधी थेट ग्रा. प. ना उपलब्ध झालेला असला तरी तो ग्रामसभा कोलसमितीच्या खात्यावर वर्ग करावयाचा आहे तसेच हा निधी ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या निहाय खर्च होणार नुसार ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व गावांच्या लोकसंख्येनिहाय खर्च करावयाचा आहे. (वार्ताहर)