शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वाड्यात ४ ग्रामपंचायती अविरोध

By admin | Updated: April 10, 2016 00:52 IST

तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार

वाडा : तालुक्यात १७ एप्रिल ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार बिनविरोध झाल्याने ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून ६१२ जागांसाठी १२७२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.सापरोंडे, कळंभे, मांडवा, आखाडा या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६६ ग्रामपंचायतीत २१९ मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून एक हजार दोनशे पन्नास कर्मचारी वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी दिली.बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या निवडणुका होत असून ग्रामपंचायत पातळीवर पक्षीय राजकारण खेळले जात नसले तरी राजकीय पुढारी व नेत्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे काही ग्रामपचांयती निवडणूका पक्षिय पातळीवर होतील असे चित्र दिसत आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आर.पी.आय, बहुजन विकास आघाडी या सर्वच पक्षांच्या नेत्यांची मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे.तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या निवडणुका म्हणून कुडूस, वडवली, नारे, कोणसई, जामघर, बिलोशी, कोंढले, डाकिवली, घोणसई, चिखले खानिवली या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेकांविरोधात पॅनल उभे केले असून येथे अत्यंत रंगतदार व चुरशीची निवडणूक होणार आहे तर नारे गावात आताच वातावरण तापले असून पोलीसांनी गस्त चालू केली आहे. भाजपाचे कुंदन पाटील तर दुसरे पॅनल प्रमुख सुधीर पाटील यांच्या रस्सीखेच सुरू आहे.औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चुरशीच्या होणार आहेत. सत्तेत असणारे विजयी होतात की त्यांना पराभव स्वीकारावा लागतो हे येत्या १७ तारखेला दिसून येईल.कुडूस ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच मिलिंद चौधरी यांच्या विरोधात जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, काँग्रेसचे डॉ. गिरीश चौधरी हे उभे राहीले असून गेली दहा वर्षे एकत्र निवडणुक लढलेले माजी सरपंच भगवान चौधरी व माजी उपसरपंच इरफान सुसे यांनी एकमेका- ंविरोधात पॅनल उभे केले आहे