शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 20:22 IST

पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा : वसई विरारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून सुर्याच्या नवीन योजनेतून वसई विरार शहराला १८५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. फक्त पीएम, सीएम, मंत्र्यांना या योजनेच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वसईकरांना पाणी मिळत नाही. यामुळे वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून राज्य शासन, एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा या पाण्याचे उदघाटन जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उदघाटन करणार आहे, यासाठी गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी सांगितले.

३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाण्याचे उदघाटन होणार होते म्हणून काही बातम्या प्रसिध्द झाल्या. पण मोदींचा असा कोणताही प्रोग्राम नसल्याचे अविनाश जाधवांनी सांगितले. याबाबत मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनाही माहीत नसल्याचे धक्कादायक माहिती त्यांनी दिली. खासदार व काही नेत्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढून त्यात नागरिकांची दिशाभूल करून उदघाटनाची तारीख कशी काय सांगितली ? १३५० कोटींचे कंत्राट २३०० करोडवर गेल्याने १ हजार कोटींचे वाढलेले पाप कोणाचे? पाणी वसईत नागरिकांना मिळू नये यासाठी कोणी प्रयत्न केले?

सत्ताधारी पाण्यासाठी मोर्चा का काढत नसून गप्प का आहेत? योजनेचे काम व सर्व पाण्याच्या चाचण्या पूर्ण होऊनही सत्ताधारी व मनपाने १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी वसईकरांना पाणी देऊन स्वातंत्र्य द्यायला पाहिजे होते. मनपा जर पाणी देऊ शकत नाही तर दोन ते अडीच वर्षांपासून नळाचे कनेक्शनचे पैसे का घेतले ? पाण्याचा साठा उपलब्ध नसतानाही टोलेगंज इमारतींना परवानगी का देत आहे ? पाण्याच्या उदघाटनासाठी कोणत्या नेत्यांची काय गरज आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून घणाघाती आरोप केला आहे.

पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे. यासाठी शर्मिला राज ठाकरे सहभागी होऊन विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 

खासदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणारपाण्यासाठी मोर्चा काढून सभेत खासदार राजेंद्र गावित यांनी ३० ऑक्टोबरची तारीख कशी काय घोषणा केली ? मोर्चा काढून ढोंगीपणा करत तारीख जाहीर करून उदघाटन का लांबले ? पंतप्रधानांचा उदघाटनाचा कार्यक्रम दाखवावा आणि जर त्यात हा कार्यक्रम नसेल तर खासदारांनी जाहीर माफी मागावी. लोकांची फसवणूक करणाऱ्या खासदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधव