शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वसई-विरारला कोरोनासह क्षयबाधेचाही घट्ट विळखा, दोन महिन्यांत ३३५ क्षयरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:25 IST

क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

- प्रतीक ठाकूर विरार : क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनासोबतच  दोन महिन्यांत तब्बल ३३५ क्षयरोगाचे रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. ऐन कोरोना महामारीच्या काळात क्षयरोगानेही डोके बाहेर काढले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भावाशी लढण्यात व्यस्त असताना क्षयरोग रुग्णांची त्यात हेळसांड होत असल्याचे दिसून येते.  महापालिकेनेच दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षात २०२० मध्ये क्षयरोगाचे एकूण तीन हजार २५१ रुग्ण आढळून आले होते. त्यात १३७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत म्हणजेच एकूण ६० दिवसांत क्षयरोगाचे तब्बल ३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात असलेल्या झोपडपट्ट्यांत तसेच स्थलांतरित होऊन आलेले नागरिक यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची तजवीज आहे. सध्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत क्षयरोगाचे प्रमाण वाढत असताना मंजूर करण्यात आलेली आठ थुंकी तपासणी केंद्रे सुरूच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.   पालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ नसल्याने पालिकेने दोन खासगी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. विरार व वालीव अशा दोन केंद्रांत या डॉक्टरांची महापालिकेकडून वर्णी लावण्यात आली आहे. क्षयरोगाच्या उपचारासाठी महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या सुविधा मर्यादित असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. क्षयरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून महापालिकेने पाच युनिट तयार केले असून त्यात पाच निरीक्षक नेमले आहेत. तसेच केवळ २५ ते ३० कर्मचाऱ्यांवर शहरांचा भार सोपवण्यात आला आहे. पालिकेच्या तुळिंज व वालीव येथील केंद्रांत क्षयरोग निदानासाठी व्यवस्था करण्यात आली असली, तरी तुळिंज येथील केंद्रातील मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.  थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार याआधी ओपीडींद्वारे होत असलेली क्षयरुग्णांची तपासणी कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापासून बंद आहे. क्षयरोग हा टीबीचा प्रकार असून त्यात मल्टीट्रग रेझिस्टंट क्षयरोग हा अतिशय धोकादायक ठरू शकतो. वसई-विरार महानगरपालिकेकडून क्षयरोगाचे निदान होण्यासाठी एकूण २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत. मात्र सद्य:स्थितीत केवळ १३ तपासणी केंद्रे सुरू असल्याचे समजते. रुग्णांना थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेच्या केंद्रांत असलेल्या थुंकी तपासणीच्या अहवालासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार