शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वसई-विरारला कोरोनासह क्षयबाधेचाही घट्ट विळखा, दोन महिन्यांत ३३५ क्षयरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:25 IST

क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

- प्रतीक ठाकूर विरार : क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनासोबतच  दोन महिन्यांत तब्बल ३३५ क्षयरोगाचे रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. ऐन कोरोना महामारीच्या काळात क्षयरोगानेही डोके बाहेर काढले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रादुर्भावाशी लढण्यात व्यस्त असताना क्षयरोग रुग्णांची त्यात हेळसांड होत असल्याचे दिसून येते.  महापालिकेनेच दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षात २०२० मध्ये क्षयरोगाचे एकूण तीन हजार २५१ रुग्ण आढळून आले होते. त्यात १३७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत म्हणजेच एकूण ६० दिवसांत क्षयरोगाचे तब्बल ३३५ रुग्ण आढळून आले आहेत. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात असलेल्या झोपडपट्ट्यांत तसेच स्थलांतरित होऊन आलेले नागरिक यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोगाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची तजवीज आहे. सध्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत क्षयरोगाचे प्रमाण वाढत असताना मंजूर करण्यात आलेली आठ थुंकी तपासणी केंद्रे सुरूच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.   पालिकेकडे क्षयरोगतज्ज्ञ नसल्याने पालिकेने दोन खासगी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. विरार व वालीव अशा दोन केंद्रांत या डॉक्टरांची महापालिकेकडून वर्णी लावण्यात आली आहे. क्षयरोगाच्या उपचारासाठी महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या सुविधा मर्यादित असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. क्षयरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून महापालिकेने पाच युनिट तयार केले असून त्यात पाच निरीक्षक नेमले आहेत. तसेच केवळ २५ ते ३० कर्मचाऱ्यांवर शहरांचा भार सोपवण्यात आला आहे. पालिकेच्या तुळिंज व वालीव येथील केंद्रांत क्षयरोग निदानासाठी व्यवस्था करण्यात आली असली, तरी तुळिंज येथील केंद्रातील मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.  थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार याआधी ओपीडींद्वारे होत असलेली क्षयरुग्णांची तपासणी कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापासून बंद आहे. क्षयरोग हा टीबीचा प्रकार असून त्यात मल्टीट्रग रेझिस्टंट क्षयरोग हा अतिशय धोकादायक ठरू शकतो. वसई-विरार महानगरपालिकेकडून क्षयरोगाचे निदान होण्यासाठी एकूण २१ तपासणी केंद्रे मंजूर झाली आहेत. मात्र सद्य:स्थितीत केवळ १३ तपासणी केंद्रे सुरू असल्याचे समजते. रुग्णांना थुंकी तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेच्या केंद्रांत असलेल्या थुंकी तपासणीच्या अहवालासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार