शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ३३ लाचखोर पकडले; भ्रष्ट्राचा-यांची माहिती द्या, पोलीस उपअधीक्षक आफळे यांचे जनतेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:41 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.

- हितेंन नाईक

पालघर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे ह्यांनी केले आहे.पालघर, डहाणू, तलासरी इ.तालुक्यातील तक्रारकर्त्या नागरिकांना ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असलेले कार्यालय लांबचे पडत असल्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºया विरोधात इच्छा असूनही तक्र ारी दाखल केला जात नव्हत्या. मात्र आता स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर आठ तालुक्यातील नागरिकांना पालघर च्या सूर्या कॉलनी मध्ये असलेले कार्यालय सोईचे पडू लागल्याने तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. पालघरच्या प्रांताधिकाºयांना ५० लाखाची लाच मागणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जव्हार यांना ५० हजाराची, तसेच वसई-विरार महानगर पालिकेतील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस इ. ३३अधिकारी कर्मचाºयांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीरीत्या सापळा रचून अटक केली असून ९ अधिकाºयावर उत्पन्न पेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई केल्याने हळूहळू लोकांमध्ये लाचलुचपत विभागा बद्दल विश्वास निर्माण होऊ लागला आहे.लोकांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे यासाठी आजपासून (३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर) दक्षता जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व कार्यालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर कार्यालयीन पत्ता, फोन नंबर, इ. लावणे सक्तीचे केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा इ.भागात ही भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृती व्हावी ह्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा इ.चे आयोजन पालघर विभागांतर्गत करण्यात येणार आहे.राज्यात प्रत्येक वर्षी सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विभागा मध्ये शपथ घेऊन त्याची सुरूवात झाली

टॅग्स :Crimeगुन्हा