शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पालघर जिल्ह्यात ३३ लाचखोर पकडले; भ्रष्ट्राचा-यांची माहिती द्या, पोलीस उपअधीक्षक आफळे यांचे जनतेला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 03:41 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.

- हितेंन नाईक

पालघर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आफळे ह्यांनी केले आहे.पालघर, डहाणू, तलासरी इ.तालुक्यातील तक्रारकर्त्या नागरिकांना ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे असलेले कार्यालय लांबचे पडत असल्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाºया विरोधात इच्छा असूनही तक्र ारी दाखल केला जात नव्हत्या. मात्र आता स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर आठ तालुक्यातील नागरिकांना पालघर च्या सूर्या कॉलनी मध्ये असलेले कार्यालय सोईचे पडू लागल्याने तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत. पालघरच्या प्रांताधिकाºयांना ५० लाखाची लाच मागणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जव्हार यांना ५० हजाराची, तसेच वसई-विरार महानगर पालिकेतील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस इ. ३३अधिकारी कर्मचाºयांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीरीत्या सापळा रचून अटक केली असून ९ अधिकाºयावर उत्पन्न पेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी कारवाई केल्याने हळूहळू लोकांमध्ये लाचलुचपत विभागा बद्दल विश्वास निर्माण होऊ लागला आहे.लोकांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे यासाठी आजपासून (३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर) दक्षता जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व कार्यालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करणारे फलक लावून त्यावर कार्यालयीन पत्ता, फोन नंबर, इ. लावणे सक्तीचे केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा इ.भागात ही भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृती व्हावी ह्यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, निबंध स्पर्धा इ.चे आयोजन पालघर विभागांतर्गत करण्यात येणार आहे.राज्यात प्रत्येक वर्षी सरदार वल्लभ भाई पटेल ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व विभागा मध्ये शपथ घेऊन त्याची सुरूवात झाली

टॅग्स :Crimeगुन्हा