शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘क्यार’चा सामना करत ३३ बोटी सुखरूप बंदरात; कुटुंबीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 22:49 IST

रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी कशी करायची?

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ३३ बोटींपैकी सर्व बोटी क्यार चक्रीवादळाचा सामना करत गुजरात तर काही दमणच्या बंदरात सुखरूप पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर पालघर, डहाणू, वसई आणि उत्तन आदी भागातील खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १ हजार ४११ बोटींना माघारी परत बोलाविण्याच्या सूचना सहकारी संस्थांनी आपल्या वायरलेस सेट यंत्रणेच्या मदतीने दिल्या. वादळाचा इशारा मिळाल्यानंतर समुद्रात टाकलेली जाळी जेमतेम घेऊन या बोटी आपापल्या बंदराकडे मार्गाक्रमण करत असताना वादळाच्या तडाख्याने जोरदार वादळी वारे निर्माण होत मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यामुळे बंदर गाठण्यासाठी २० ते २२ तासांचा अवधी लागणार असल्याने व प्राप्त परिस्थितीत शक्य नसल्याने सुरक्षित किनारे शोधण्याच्या प्रयत्नात काही बोटी गुजरात, दीव-दमण भागात तर काही बोटी देवगड बंदरात नेण्यात आल्या.

सातपाटी बंदरातून २०० ते २२५ बोटी १६ ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. दिवाळीपूर्वी चांगले मासे मिळाल्यास खलाशी कामगार,बोटीचा तांडेल यांचे तीन महिन्यांचे पगार देऊन दिवाळी साजरी करण्याचे मनसुबे बोट मालकांचे होते. मात्र ढगाळ वातावरण आणि परतीचा पाऊस यामुळे मासेच मिळत नसल्याने सर्व हवालदिल झाले होते.कर्जाचा डोंगर वाढत जाणारयावर्षी एक ऑगस्टपासून सुरूवात झालेल्या मासेमारी हंगामापासून मच्छिमारांना पुरेसे मासेच न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका ठिकाणी माशांचा घसरलेला दर तर दुसऱ्या ठिकाणी या बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासे मिळत नसल्याने आमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याची खंत ऋ षिकेश मेहेर याने व्यक्त केली.तोटा सहन करून परत यावे लागलेक्यार चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिल्यानंतर १० दिवसात जमलेले ४० ते ५० किलो मासे घेऊन आम्हाला तोटा सहन करून परत यावे लागल्याचे भावेश मेहेर या मच्छिमाराने ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या मत्स्यगंधा, आदिमाया या दोन बोटी आणि अन्य विश्वकर्मा एक बोट अशा तीन बोटी शुक्र वारी रात्री दमणच्या बंदरात पोहचण्यासाठी निघाल्या मात्र बंदरात पोचण्याआधी वादळी वारे व लाटा उसळू लागल्याने समुद्रात नांगर टाकून आम्हाला काही तास थांबावे लागले. शनिवारी सकाळी वातावरण निवळल्याने बोटी दमणच्या बंदरात सुखरूप ठेवल्या आहेत.