शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘क्यार’चा सामना करत ३३ बोटी सुखरूप बंदरात; कुटुंबीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 22:49 IST

रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी कशी करायची?

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ३३ बोटींपैकी सर्व बोटी क्यार चक्रीवादळाचा सामना करत गुजरात तर काही दमणच्या बंदरात सुखरूप पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर पालघर, डहाणू, वसई आणि उत्तन आदी भागातील खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १ हजार ४११ बोटींना माघारी परत बोलाविण्याच्या सूचना सहकारी संस्थांनी आपल्या वायरलेस सेट यंत्रणेच्या मदतीने दिल्या. वादळाचा इशारा मिळाल्यानंतर समुद्रात टाकलेली जाळी जेमतेम घेऊन या बोटी आपापल्या बंदराकडे मार्गाक्रमण करत असताना वादळाच्या तडाख्याने जोरदार वादळी वारे निर्माण होत मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यामुळे बंदर गाठण्यासाठी २० ते २२ तासांचा अवधी लागणार असल्याने व प्राप्त परिस्थितीत शक्य नसल्याने सुरक्षित किनारे शोधण्याच्या प्रयत्नात काही बोटी गुजरात, दीव-दमण भागात तर काही बोटी देवगड बंदरात नेण्यात आल्या.

सातपाटी बंदरातून २०० ते २२५ बोटी १६ ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. दिवाळीपूर्वी चांगले मासे मिळाल्यास खलाशी कामगार,बोटीचा तांडेल यांचे तीन महिन्यांचे पगार देऊन दिवाळी साजरी करण्याचे मनसुबे बोट मालकांचे होते. मात्र ढगाळ वातावरण आणि परतीचा पाऊस यामुळे मासेच मिळत नसल्याने सर्व हवालदिल झाले होते.कर्जाचा डोंगर वाढत जाणारयावर्षी एक ऑगस्टपासून सुरूवात झालेल्या मासेमारी हंगामापासून मच्छिमारांना पुरेसे मासेच न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका ठिकाणी माशांचा घसरलेला दर तर दुसऱ्या ठिकाणी या बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासे मिळत नसल्याने आमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याची खंत ऋ षिकेश मेहेर याने व्यक्त केली.तोटा सहन करून परत यावे लागलेक्यार चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिल्यानंतर १० दिवसात जमलेले ४० ते ५० किलो मासे घेऊन आम्हाला तोटा सहन करून परत यावे लागल्याचे भावेश मेहेर या मच्छिमाराने ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या मत्स्यगंधा, आदिमाया या दोन बोटी आणि अन्य विश्वकर्मा एक बोट अशा तीन बोटी शुक्र वारी रात्री दमणच्या बंदरात पोहचण्यासाठी निघाल्या मात्र बंदरात पोचण्याआधी वादळी वारे व लाटा उसळू लागल्याने समुद्रात नांगर टाकून आम्हाला काही तास थांबावे लागले. शनिवारी सकाळी वातावरण निवळल्याने बोटी दमणच्या बंदरात सुखरूप ठेवल्या आहेत.