शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

‘क्यार’चा सामना करत ३३ बोटी सुखरूप बंदरात; कुटुंबीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 22:49 IST

रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी कशी करायची?

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातून खोल समुद्रात मासेमारीला गेलेल्या ३३ बोटींपैकी सर्व बोटी क्यार चक्रीवादळाचा सामना करत गुजरात तर काही दमणच्या बंदरात सुखरूप पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रिकाम्या हाताने परतावे लागल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर पालघर, डहाणू, वसई आणि उत्तन आदी भागातील खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १ हजार ४११ बोटींना माघारी परत बोलाविण्याच्या सूचना सहकारी संस्थांनी आपल्या वायरलेस सेट यंत्रणेच्या मदतीने दिल्या. वादळाचा इशारा मिळाल्यानंतर समुद्रात टाकलेली जाळी जेमतेम घेऊन या बोटी आपापल्या बंदराकडे मार्गाक्रमण करत असताना वादळाच्या तडाख्याने जोरदार वादळी वारे निर्माण होत मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यामुळे बंदर गाठण्यासाठी २० ते २२ तासांचा अवधी लागणार असल्याने व प्राप्त परिस्थितीत शक्य नसल्याने सुरक्षित किनारे शोधण्याच्या प्रयत्नात काही बोटी गुजरात, दीव-दमण भागात तर काही बोटी देवगड बंदरात नेण्यात आल्या.

सातपाटी बंदरातून २०० ते २२५ बोटी १६ ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. दिवाळीपूर्वी चांगले मासे मिळाल्यास खलाशी कामगार,बोटीचा तांडेल यांचे तीन महिन्यांचे पगार देऊन दिवाळी साजरी करण्याचे मनसुबे बोट मालकांचे होते. मात्र ढगाळ वातावरण आणि परतीचा पाऊस यामुळे मासेच मिळत नसल्याने सर्व हवालदिल झाले होते.कर्जाचा डोंगर वाढत जाणारयावर्षी एक ऑगस्टपासून सुरूवात झालेल्या मासेमारी हंगामापासून मच्छिमारांना पुरेसे मासेच न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका ठिकाणी माशांचा घसरलेला दर तर दुसऱ्या ठिकाणी या बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासे मिळत नसल्याने आमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याची खंत ऋ षिकेश मेहेर याने व्यक्त केली.तोटा सहन करून परत यावे लागलेक्यार चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिल्यानंतर १० दिवसात जमलेले ४० ते ५० किलो मासे घेऊन आम्हाला तोटा सहन करून परत यावे लागल्याचे भावेश मेहेर या मच्छिमाराने ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या मत्स्यगंधा, आदिमाया या दोन बोटी आणि अन्य विश्वकर्मा एक बोट अशा तीन बोटी शुक्र वारी रात्री दमणच्या बंदरात पोहचण्यासाठी निघाल्या मात्र बंदरात पोचण्याआधी वादळी वारे व लाटा उसळू लागल्याने समुद्रात नांगर टाकून आम्हाला काही तास थांबावे लागले. शनिवारी सकाळी वातावरण निवळल्याने बोटी दमणच्या बंदरात सुखरूप ठेवल्या आहेत.