शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

सूर्या-धामणी धरणांत ३२.६२ टक्के पाणीसाठा; वसईकरांची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 00:18 IST

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही,

आशीष राणे

वसई : जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वसईतील उसगाव व पेल्हार या दोन धरणांतील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे, मात्र वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालघरमधील सूर्या-धामणी धरणांत अद्यापही ३२.६२ टक्के पाणीसाठा असल्याने वसई-विरारकरांना पाणीबाणीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. सूर्या-धामणी धरणातील पाणीसाठा वर्षभर तरी पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे सूर्या-धामणी हे मुख्य धरण वगळता उसगाव आणि पेल्हार या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्याची पातळी कमी झाल्याने यंदा पाणीकपात केली जाणार का, याबाबत आयुक्त आणि उपअभियंता पाणीपुरवठा सुरेंद्र ठाकरे यांना संपर्क केला असता तो झाला नाही. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी, तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता जून महिना संपत आला तरी वरुणराजाने अल्प हजेरी लावल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

गतवर्षी पडलेल्या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा आता खालावत चालला आहे. जिल्ह्यातील तीन धरणांपैकी पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६..३५ घनमीटर दशलक्ष लिटर (९०.१४१ दशलक्ष) म्हणजेच ३२.६२ टक्के तर वसई तालुक्यातील उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष (०.५६२ दशलक्ष), ११.३३ टक्के आणि पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर (०.११८ दशलक्ष ) म्हणजेच ३.३१ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

जून महिना संपला तरी पावसाने जोरदार हजेरी न लावल्यामुळे वसई-विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पुढील काही दिवसात पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे सूर्या-धामणी धरणातील पाण्याचा विचार करून वसई-विरार शहरात कुठेही पाणीकपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.पाणीपुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहनवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाण्याची समस्या किमान काही महिने भेडसावणार नाही, इतका साठा असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनीदेखील पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.धरणात असलेल्या पाण्याच्या पातळीनुसार धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत महापालिकेला अतिशय काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. सूर्याच्या दोन्ही योजनांतून २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असून तो साधारण ३६५ दिवस पुरेल, तर उसगाव धरणातून २० तर पेल्हारमधून १० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत आहे. यात उसगाव धरणात १८ दिवस, तर पेल्हार धरणात ८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार