शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

मच्छी मार्केटला ३२ लाख, वसईतील हजारो मच्छिमार महिलांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:09 IST

वसई : अर्नाळा समुद्रकिनारी मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या जागेत सुकी मासळी बाजारासाठी शेड बांधण्यात येणार आहे.

शशी करपे वसई : अर्नाळा समुद्रकिनारी मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या जागेत सुकी मासळी बाजारासाठी शेड बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी मासळी विक्रेत्या महिलांसाठी विविध सोयी केल्या जाणार आहेत. या मार्केट शेडसाठी जिल्हा नियोजन समितीने ३२ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीला मंजूरी दिली असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.अर्नाळा हे वसई तालुक्यातील मुख्य बंदर आहे. येथील सुके बोंबील आणि जवळा प्रसिद्ध आहे. या मासळीचा व्यवसाय प्रामुख्याने अर्नाळ््यात होत असून शेकडो मच्छीमार महिला सुकी मासळी विक्रीचा व्यवसाय करीत असतात तरीही अर्नाळा गावात सुकी मासळीसाठी मार्केट नव्हते. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून आगाशी गावात दर सोमवारी आठवडेबाजार भरत असतो. त्यात अर्नाळ््यातीलच सुकी मासळी सर्वात अधिक विकली जाते. या बाजारात येणाºया महिलांसाठी कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. महिला ऊन-पावसात उघड्यावरच मासे विकायला बसतात. त्यांची ही परवड लक्षात घेऊन अर्नाळा गावातच सुक्या मासळीचा बाजार सुरु व्हावा यासाठी अर्नाळ््यात मार्केट बांधण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत सवरा यांनी जिल्हा नियोजन समितीतून मार्केट शेड बांधण्यासाठी ३२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे.अर्नाळा एसटी डेपोसमोर ३५ एकर जागा मासळी सुकवणे, जाळी विणणे, बोटी शाकारणे यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्याठिकाणी आता मार्केट शेड बांधण्यात येणार आहे. तसेच महिला विक्रेत्यांसाठी प्राथमिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा फायदा वसई तालुक्यातील हजारो मच्छीविक्रेत्या महिलांना होणार असून त्यांच्या अडचणीही दूर होणार आहेत.> राखीव भूखंडावरील अतिक्रमणे हटविणारमच्छिमारांसाठी राखीव असलेल्या भूखंडांवर अ़नेक रिसॉर्ट चालकांनी अतिक्रमण केले आहे. त्याठिकाणी बागा बनवून त्या पार्टीसाठी भाड्याने दिल्या जात आहेत. तर काहींनी पार्किंगची सुविधा केली आहे. काहींनी सरकारकडून झाडे लावण्यासाठी जागा स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. प्रत्यक्षात अटी आणि शर्तींचा भंग करून त्यांनी त्याचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे. तर राखीव भूखंडावरही अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या भूखंडावरील ही अतिक्रमणे दूर करून तो मच्छिमारांच्या वापरासाठी मोकळा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.