शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आश्रमशाळेतील ३ मुलांना विषबाधा; प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:05 IST

शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनोर : शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्याध्यापक मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत होते तर अधीक्षक घरी डुलक्या घेत होते. याबाबत पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.विक्र मगड तालुक्यातील चाबके तलावली येथे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थीनी व एक विद्यार्थी यांना अन्नातून किंवा दूषित पाण्यातून विष बाधा झाली झाल्या असावी त्यामुळे काही काळ त्यांची प्रकृती बिघडली त्यांच्या पोटात कळा येऊ लागल्या व त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना उपचारा साठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रोहिणी किसन किरिकरे, रणजित संदीप दुमडा दोघेही इयत्ता पाचवी, माधुरी, जयराम पारधी , सहावी अशी त्यांची नावे असून ते उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ गावित ह्यांनी सांगितले की कुठल्यातरी फूड पॉयझनिंगमुळे हे झाले असावे.ते कदाचित पाण्यामुळेही होऊ शकते त्यांच्यावर आम्ही औषधे आणि सलाईनचे उपचार केले आहेत. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे त्या ठिकाणचे पाणी आणले आहे त्याची तपासणी होईल.मुख्याध्यापक सुधीर माने यांना विचारले असता ते म्हणाले शाळेत ५०० विद्यार्थी आहेत त्यांना काही झाले नाही यांनांच कसे झाले त्यांनी सकाळी बाहेर जाऊन वडापाव खाल्ला होता म्हणून त्याची प्रकृती बिघडली असावी त्यांना उपचारासाठी मी स्वत: रुग्णालयात आणले आहे. आश्रम शाळेचे अधीक्षक कुठे आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की ते घरी गेले आहेत. रणजित चे वडील संदीप दुमडा यांनी सांगितले की माझ्या मुलाची तब्येत रात्री खराब झाली. त्याच्या पोटात दुखत होते हे आम्हाला त्याला सकाळी मनोरला आणले तेव्हा माहीत झाले. आणि आम्ही आलो. आश्रम शाळेत लाखो रुपये येतात मात्र त्या आश्रम शाळेत मुलांना मिळणारा जेवण बरोबर नसते म्हणून माझ्या मुलाला पोटात दुखत असावे. आश्रमशाळेत पुरेशी स्वछता नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार